Monday, March 7, 2022

हवामान खात्याचा इशारा, राज्यात पुढील तीन दिवस.विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता.

 
मुंबई(प्रतिनिधी )सध्या राज्यातील अनेक भागात हरभरा आणि गहू काढण्याची तयारी सुरू आहे. या कामात पाऊस अडथळा आणू शकतो. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 7 ते 10 तारखेपर्यंत पाऊस हजेरी लावणार आहे. विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान महाराष्ट्र, गुजरात, पूर्व राज्यस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात दिनांक 7 ते 10 या कालावधीत विजांच्या गडगडाटासह काही भागात तुरळक पाऊस हजेरी लावणार आहे. आपल्या काढणी झाल्या असतील तर लवकर मळणी करून घ्या, अशा सूचना शेतकऱ्यांना दिल्या आहेत.

7 मार्च रोजी या ठिकाणी पाऊस -

आज नंदुरबार, धुळे, नाशिक, औरंगाबाद, आणि जळगाव या भागाला हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. या भागात जोरदार पाऊस कोसळणार असे सांगितले आहे. तसेच पालघर, ठाणे, पुणे व अहमदनगर या ठिकाणी तुरळक पाऊस पडणारी आहे असे सांगितले.

८ व ९ मार्च रोजी -

धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बुलढाणा, परभणी, जालना, बीड, परभणी, वाशीम, हिंगोली,अकोला , अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस कोसळणार.

१० मार्च रोजी -

बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, धुळे या भागात हलका पाऊस पडणार आहे

No comments:

Post a Comment