मुंबई - महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पुढचे चार ते पाच दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला अलर्ट देण्यात आला आहे.
२४ एप्रिल ते २७ एप्रिलपर्यंत या भागांत विजांच्या गडगडाटांसह, वादळी मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, येत्या २ ते ३ दिवसांत विदर्भात मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाट, जोरदार वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
तर उद्या सोमवारी (दि.२४) विदर्भात काही ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्याचे देखील IMD पुणे, चे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये सांगितले आहे
No comments:
Post a Comment