बीड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील बीड तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना म्हणजे राजुरीचा गजानन सहकारी साखर कारखाना आहे. हा साखर कारखाना मागच्या आठ वर्षापासून बंद आहे .
काही दिवसांपूर्वीच एका जाहीर कार्यक्रमात या साखर कारखान्या बाबतीत बोलताना बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी गजानन सहकारी साखर कारखाना लवकर सुरू करावा अशी मागणी केली होती
सन 2014 पासून राजुरीचा गजानन सहकारी साखर कारखाना कारखाना बंदच आहे . यामुळे येथील उस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाच्या समस्यांचा मोठा सामना करावा लागत आहे , परंतु याकडे संबंधित नेत्यांनी म्हणावे तसे लक्ष आज पर्यंत दिलेले नव्हते .
कर्जाचा आकडा वाढतच असल्यामुळे या कारखान्यावर नियंत्रण असलेल्या बँकेनेच आता हा कारखाना भाडेतत्वावर सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते . यामुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकरी यांच्या ऊसाचा प्रश्न सुटणार आहे.
No comments:
Post a Comment