Friday, February 25, 2022

गद्दारांच्या नाही तर, विश्वासू मित्रांच्या जीवावर काम केल्याने तालुक्यात शिवसेनेचाच भगवा फडकणार - बदामराव पंडित


* गेल्या तीस वर्षापासून मी गेवराई तालुक्याच्या सामाजिक चळवळीत काम करत आहे. गट-तट आणि जात-पात याचा कधीच विचार केला नाही. जो येईल त्याचे काम केले. आजही करत आहे.

बीड (प्रतिनिधी) गेल्या तीस वर्षापासून मी गेवराई तालुक्याच्या सामाजिक चळवळीत काम करत आहे. गट-तट आणि जात-पात याचा कधीच विचार केला नाही. जो येईल त्याचे काम केले. आजही करत आहे. आपण आज पर्यंत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम केले ते, "गद्दारांच्या" जीवावर नाही तर "विश्वासू मित्रांच्या" जिवावर केले.(Shiv Sena public meeting)

      

त्यामुळे कोण कोठे गेला ? याचा मी कधीच विचार करत नाही. पण जो माझ्या सोबत आला त्याला मात्र आयुष्यभर विसरणार नाही. यावेळीही तालुक्यात शिवसेनेचाच भगवा फडकणार असे रोखठोक प्रतिपादन शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केले आहे.

       शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रेवकी या जिल्हा परिषद गटात आयोजित केलेल्या जनसंवाद बैठकीत ते बोलत होते.
     

 याप्रसंगी जि प माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडित, युवानेते रोहित पंडित, जय भवानी कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय येवले, शिवसेना तालुकाउपप्रमुख दिनकर शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख गोविंद दाभाडे, उपजिल्हाप्रमुख शेख सिराज, मधुकर मस्के, कानिफनाथ नागरे, कैलास कोकणे, भास्कर हातागळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment