मुंबई ;-- लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर आता उत्तरपत्रिका तपासणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. दहावीच्या 40-45 टक्के, तर बारावीच्या 65 टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत.
या वर्षी दहावीचा निकाल 20 ते 30 जुलैदरम्यान, तर बारावीचा निकाल 5 ते 14 जुलैदरम्यान जाहीर करून 1 ऑगस्टपासून प्रवेशप्रकिया सुरु करण्याचे नियोजन झाले आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
No comments:
Post a Comment