* पडाळकरांवर कारवाई करा-बीड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास देशमुख.
परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः-
देशाचे माजी कृषीमंत्री, शेतकरी, कष्टकरी व दिनदुबळ्यांचे कैवारी, राष्ट्रवादी काँगे्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जावून बेताल वक्तव्य करणारे भाजपचे गोपीचंद पडळकर यांचा शरद पवार विचार मंचच्या वतीने परळीत जाहीर निषेध करण्यात आला असून पडळकरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी विचार मंचचे बीड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास देशमुख यांनी केली आहे.
शरद पवार विचार मंच च्या वतीने बुधवारी (ता.24) परळी तहसील कार्यालयात दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, भाजपचे पडळकर यांनी श्री पवार साहेबांवर केलेल्या बेताल व्यक्तव्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील सर्वसामान्य नागरिक, पक्ष कार्यकर्ते, समर्थक यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणी शरद पवार विचार मंचने दिलेल्या निवेदनात पडळकरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
पडळकरांवर कारवाई न झाल्यास शरद पवार विचार मंचच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा बीड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास देशमुख यांनी दिला आहे. दरम्यान, तहसील कार्यालयात निवेदन देताना श्री देशमुख यांच्यासह
श्रीकांत माने, सुनील देशमुख, लक्ष्मण कलमे, अरविंद देशमुख, सतीश भोकरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांना हे निवेदन सादर करण्यात आले.
दरम्यान, देशासह महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपले आयुष्य दिले आहे. अशा नेत्यांवर बेताल व्यक्तव्य करणे अशोभनिय आहे असेही श्री देशमुख यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
No comments:
Post a Comment