Wednesday, June 24, 2020

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॕक बरखास्त करा ;- भाई थावरे.

बीड (प्रतिनीधी )ः- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकर्‍याची बँक म्हणून ओळखली जाते. मात्र या बँकेकडून शेतकर्‍यांना कसल्याही प्रकारचा फायदा  मिळत नाही. त्यामुळे या बँकेचे संचालक मंडळच बरखास्त केलेले बरे आहे तसेच राष्ट्रीयकृत बँकेतही शेतकर्‍यांना चांगली वागणूक मिळत नाही. शेतकर्‍यांची अडवणूक करणार्‍या बँक कर्मचार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शेतकरी संघटनेचे गंगाभिषण थावरे यांनी केली.
सध्या पिक कर्जाचे वाटप सुरू आहे. मात्र पिक कर्ज अत्यंत कमी प्रमाणात वाटप करण्यात आले. याला सर्वस्वी बँक प्रशासन जबाबदार आहे. जिल्हा बँकही शेतकर्‍यांची बँक म्हणून ओळखली जाते. मात्र या बँककडून शेतकर्‍यांची नेहमीच अवहेलना केली जाते. आजपर्यंत जे काही शेतकर्‍यांना अनुदान व कर्ज माफी आली आहे. ती जिल्हा बँकेमार्फत आली. पिक विम्याची रक्कमही जिल्हा बँकेत येते. बँक शेतकर्‍यांना वेळेवर त्यांचे आलेले पैसे वाटप करत नाही. बँक प्रशासन स्वतः पैसे वापरते आणि त्यानंतर काही दिवसांनी शेतकर्‍यांना वाटप करते. पिक कर्जाचे अनुमान काढले असता. अत्यंत कमी पिक  कर्ज जिल्हा बँकेने वाटप केले. जिल्हा बँक खर्‍या अर्थाने शेतकर्‍याची असतांना त्यांचा लाभ शेतकर्‍यांना होत नसेल तर या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केलेले बरे आहे असे गंगाभिषण थावरे यांनी म्हटले आहे. तसेच राष्ट्रीयकृत बँकेतही शेतकर्‍यांना न्याय मिळत नाही. या बँकेतील कर्मचारी अधिकार्‍यांना मराठी भाषा कळत नाही त्यामुळे शेतकरी आणि कर्मचार्‍यांमधला संवाद व्यवस्थीत होत नाही. बँकेचे कर्मचारी शेतकर्‍यांचा अवमान करतात. अशा कर्मचार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणीही गंगाभिषण थावरे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment