नवी दिल्ली - संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरले असून विरोधी पक्षातील खासदारांचे ऐतिहासिक निलंबन करण्यात आले.आतापर्यंत या अधिवेशनात लोकसभा व राज्यसभेतील एकूण 146 खासदारांना निलंबित करण्यात आल्याने भाजपाला आव्हान देणाऱ्या विरोधकांचा आवाज कमकुवत झाला आहे.
याचवेळी सरकारकडून एक वादग्रस्त विधेयक मंजूर करण्यात आले आहे.निवडणूक आयुक्त निवडीच्या समितीतून सरन्यायाधीशांना वगळणार विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं.
केंद्रीय निवडणूक आयुक्त निवडण्यासाठी समितीची रचना जाहीर झाली केली होती. मात्र, या समितीच्या रचनेत केंद्र सरकारने महत्त्वाचा बदल करत सरन्यायाधीशांना या समितीतून वगळले आणि ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्यांचा त्यात समावेश केला. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी हे विधेयक सादर करण्यात आले होते. राज्यसभेत आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर आता संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयुक्त निवडीच्या समितीतून सरन्यायाधीशांना वगळण्यात आल्याने मुख्य निवडणूक आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या मुठीत राहतील, असा आक्षेप विरोधकांनी घेतला होता.
केंद्र सरकारने ‘केंद्रीय निवडणूक आयुक्त नियुक्ती व सेवास्थिती-2023’ हे विधेयक (Bill) पावसाळी अधिवेशनात 10 ऑगस्ट रोजी संसदेत आणले होते. मंगळवारी राज्यसभेत विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले होते. या विधेयकावर टीकेची झोड उठवतानाच विरोधी पक्षांनी सभात्याग केला होता. त्यामुळे हे विधेयक मंजूर होऊ शकले. आता लोकसभेत सत्ताधारी पक्षाचे बहुमत असल्याने येथेही मंजुरीसाठी काही अडचणी आल्या नाहीत
No comments:
Post a Comment