बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर शनिवारी सकाळी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्यावतीने मिलेट दौडच्या उद्घाटन प्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. पुढे मंत्री सत्तार म्हणाले की, राज्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचे नुकसान झाले असल्याने काही ठिकाणी पीक पंचनाम्यांची अंमलबजावणी सुरु आहे तर काही ठिकाणी कर्मचारी नसल्याने अडचण आहे. पंचनाम्यासाठी यंत्रणा नसेल किंवा तुमच्याकडे कर्मचारी येत नसतील तर अशा संकटाच्या काळामध्ये बीएसस्सी ॲग्री व इतर शिकलेल्या तरुणांकडून काही काम करुन घेता येईल का ? अशी विचारणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आमच्या लोकांनी संप परत घेतला नाही तर आम्हाला पर्यायी व्यवस्था करावी लागेल. नुकसानीची दक्षता घेण्याचा आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे, त्यावर विचार सुरु असून निर्णय घेणार आहे. मात्र आस्मानी संकटाच्या वेळी आपल्या शेतकरी बांधवांना वेठीस धरु नये असे आवाहन कृषी मंत्र्यांनी केले.
पीक पंचनामे झाले नाही तर त्याची शेतकरी मी जाहीर केलेल्या चार क्रमांकावर कॉल करु शकतील. त्या संदर्भाने एक प्रेस नोट तयार केली आहे. तसेच एक सहाजणांची टीम स्थापन केली असून त्यातील सदस्य शेतकऱ्यांना पीक पंचनाम्यासाठी मदत करतील असेही कृषी मंत्री सत्तार म्हणाले.
No comments:
Post a Comment