बीड (प्रतिनिधी) शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी बीड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजलगाव - पाथरी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता राेकाे आंदाेलन छेडले आहे.
शेतमालाला हमीभाव द्या, शेतकऱ्याला 10 हजार रुपये महिना पेन्शन द्या या व अन्य मागण्यांसाठी बीड येथील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज कार्यकर्त्यांनी माजलगाव - पाथरी रोडवर मोठेवाडी येथे तब्बल दीड तास रास्ता रोको करत शासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला
यावेळी रास्ता राेकाे आंदाेलनामुळे महामार्गावर दोन ते तीन किलो मिटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शासनाने शेतकऱ्यांचा बी- बियाणे, खते, औषधे, रोजंदारी, डिझेल, पेट्रोल, व यंत्रसामग्री यांच्या किंमतीत प्रचंड भाववाढ केली आहे. त्यामुळे वास्तव खर्चावर आधारित शेतकऱ्यांच्या शेतीमाला किफायतशीर हमी भाव देण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment