Friday, March 17, 2023

ज्या शेतावर जीवापाड प्रेम केले तेथेच साेडला प्राण, शेतक-याच्या आत्महत्येने गावात शाेककळा.

केज (प्रतिनिधी): सततच्या पावसामुळे खरीप पीक गेले. थोडंफार हाती पडलं त्याला भाव नाही. रब्बी हंगामही असा तसाच गेला. यामुळे शेतकऱ्याने  नैराश्यातून शेतातच  आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असणाऱ्या कळमअंबा येथे घडली.
पठाण राजेखां उमरावखां (रा. कळमअंबा ता. केज) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बीडच्या केज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,सुना नातवंडे व चार विवाहित मुली असा परिवार आहे.
परतीच्या पावसाने शेतक-यांचे माेठं नुकसान केले आहे. त्यातच पिकाला याेग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. रब्बी हंगामही असा जात असल्याने शेतकरी माेठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातूनच ते नैराश्यातून आत्महत्या करीत असल्याचे चित्र सध्या बीड जिल्ह्यात दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment