Thursday, December 24, 2020

कुलकर्णी-आयचित विवाह सोहळा साधेपणाने साजरा.कोरोना नियमांचे वर्‍हाडींनी केले पालन.


परळी वैजनाथ-(प्रतिनिधी)चि.बालाजी प्रसाद कुलकर्णी परळी व चि.सौ.कां.अक्षदा जयतिर्थाचार्य आयचित रा.गंगाखेड यांचा विवाह सोहळा आज परळी येथे उत्साहपूर्ण व तेवढयाच साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी विवाह कार्यक्रमातील अनावश्यक खर्चाला टाळा देण्यासोबतच कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या शासकिय नियमांचे पालन वर्‍हाडी मंडळींनी केले. 
परळी येथील प्रसाद कुलकर्णी यांचा मुलगा चि.बालाजी आणि गंगाखेड येथील जयतिर्थाचार्य यांची सुकन्या चि.सौ.कां.अक्षदा यांचा विवाह सोहळा परळी येथे आज पार पडला. यावेळी वर्‍हाडी मंडळींनी तोंडावर मास्क बांधण्यासेाबतच सुरक्षित अंतर व आवश्यक असलेल्या सर्व नियमांचे पालन केले. वधु आणि वर या दोन्ही कुटूंबियांनी विवाह कार्यक्रमावर अतिरिक्त खर्च कमी करून अत्यंत साधेपणाने हा विवाह सोहळा पार पाडला. उपस्थित पाहुण्यांनी दोन्ही कुटूंबियांचे साधेपणाने विवाह केल्याबद्दल अभिनंदन केले व नवदांम्प्त्यांना शुभाआशिर्वाद दिले.

No comments:

Post a Comment