औरंगाबाद : मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिध्द करुन ईएसबीसी मध्ये घटनात्मक आरक्षण मिळण्यासाठी 58 मोर्चे काढले. अनेकांनी 42 तरुणांनी बलिदान दिले. असे असताना समाजाच्या आरक्षणास स्थगिती मिळाली आहे. ती स्थगिती उठविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. आता ईडब्ल्युएस चांगले असल्याचा दावा करण्यात येत आहेत. या ईडब्ल्युएसला मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे विरोध करण्यात येत आहे. याच संदर्भात पुढील दिशा ठरविण्यासाठी एक जानेवारीला औरंगाबादेत राज्यव्यापी मराठा आरक्षण जनजागृती महामेळावा घेण्यात येणार आहेत. अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केरे म्हणाले, ईडब्ल्युएस मराठा समाजाला कधीच मान्य राहणार नाही. एसईबीसी आरक्षण टिकावा नसता, ओबीसीतून आरक्षण मिळावे, अशी भुमिका घेण्यात आली होती. न्यायालयान एसईबीली मराठा आरक्षणाचा कायद्यावर शिकेमोर्तब केले होते. तेव्हा न्यायालयाने राज्य सरकारला ओबीसी प्रवर्गातील जातीचा सर्व्हे करुन निर्णय घेण्यात यावा असा आदेश असताना राज्य सरकारने काहीच कारवाई केली नाही. असे विविध मुद्दे मांडले. मराठा क्रांती मोर्चातर्फे पुढील दिशा ठरविण्यासाठी एक जानेवारीला जनजागृती मेळावा घेण्यात येणार असल्याचेही केरे म्हणाले.
Sunday, December 27, 2020
एक जानेवारीला मराठा आरक्षण जनजागृती महामेळावा.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment