* करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक अंतर आणि तोंडाला मास्क बांधणे आवश्यक आहे.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी शुक्रवारी केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची भोकरदन येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचे फोटो समोर आले आहेत. त्यात कौटुंबिक सत्कारात दोन्ही मंत्र्यांसह उपस्थितांनी तोंडाला मास्क बांधले नसल्याचे दिसत आहे.
करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक अंतर आणि तोंडाला मास्क बांधणे आवश्यक आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासमवेत रावसाहेब दानवे पाटील यांची भेट घेतली.
No comments:
Post a Comment