Monday, June 30, 2025

कांताबाई भीमाशंकर स्वामी (मठपती) यांचे दुःखद निधन.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जंगम गल्ली, परळी वैजनाथ येथील रहिवासी व समाजसेविका श्रीमती कांताबाई भीमाशंकर  स्वामी (मठपती) यांचे रविवार, दिनांक २९ जून २०२५ रोजी रात्री ९.३० वाजता दुःखद निधन झाले. निधन समयी त्या ७१ वर्षांच्या होत्या.
कांताबाई स्वामी (मठपती) या अत्यंत मनमिळावू, सुस्वभावी आणि सामाजिक कार्यात सक्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून परळीत सर्वपरिचित होत्या. वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक व सामाजिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता.
त्यांच्या पश्चात एक मुलगा धनंजय स्वामी (मठपती), नातु गणेश , अनुराग , आदित्य , एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
आज सोमवार, दिनांक ३० जून रोजी त्यांच्यावर वीरशैव लिंगायत स्मशानभूमी, परळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीस समाजातील अनेक मान्यवर, नातेवाईक,  आणि हितचिंतक उपस्थित होते. स्वामी कुटुंबीयांच्या दुःखात दैनिक कांतीकारी साथी परिवार सहभागी आहे.

No comments:

Post a Comment