जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास आला आहे .तक्रारीच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद ,बदनापूर ,मंठा, जालना आणि अंबड अशा सहा तालुक्यामधून या आर्थिक गुन्हे शाखेकडे सुमारे 600 तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीची एकूण गुंतवणूक सुमारे 31 कोटी पर्यंत जात आहे. त्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस या बँकेचे अध्यक्ष श्री.कुटे यांच्या मार्गावर आहेत. कदाचित कुटे आणि त्यांच्या संचालक मंडळाची मालमत्ता देखील जप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही .जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि परतुर या दोन्ही तालुक्यातून अद्याप पर्यंत फसवणूक झाल्याची एकही तक्रार नाही. दरम्यान क्रेडीट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा सर्व व्यवहार हा थेट दिल्लीवरून पाहिल्या जातो. त्यामुळे आर्थिक पतसंस्थांवर स्थानिक पातळीवर ज्या जिल्हा उपनिबंधकांचे नियंत्रण असते त्या नियंत्रण कक्षेत या को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी येत नाहीत. त्यामुळे जोपर्यंत मोठा घोटाळा होत नाही तोपर्यंत अशा सोसायट्यांमधील घोटाळे बाहेर येत नाहीत .यापूर्वी पैठण ,माजलगाव ,बीड येथेही मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झालेले आहेत.
No comments:
Post a Comment