Monday, August 14, 2023

आघाड्यांच्या राजकारणामुळे बीड जिल्ह्यातील काँग्रेसवर अन्याय झाला:-अमित देशमुख


बीड (प्रतिनिधी) : आघाडीच्या राजकारणामुळे बीड जिल्ह्यातील काँग्रेसवर अन्याय झाला. मात्र आता सर्वच दारे खुली झाले आहेत. त्यामुळं आता काँग्रेस बीड लोकसभा निवडणूक ताकतीने लढणार आहे, असं काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अमित देशमुख म्हणाले आहेत.

जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघातही आम्ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत. अशी खंत आणि इच्छा अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे. ते बीडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, की बीड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सहनशीलतेचे कौतुक करावं वाटतंय. आतापर्यंत जिल्ह्यातील काँग्रेसवर अन्याय झालाय. मात्र आता पुढील काळात ते होणार नाही. आज महाराष्ट्राची राजकीय परंपरा राहिलेली आहे. कुठंतरी त्याला छेद झालाय, असं मला आणि सर्वांना वाटतंय.

महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचे काम केले. मात्र आज जे महाराष्ट्रात सुरू आहे, तेव्हा दुःख वाटतं. आता वाटाघाटीचे राजकारण आहे. आज पक्ष वाढत नाही, कारण आघाडीच्या राजकारणात संधी मिळाली नाही. अशी खंत देखील यावेळी अमित देशमुख यांनी व्यक्त केली.

दरम्यान, बीडमध्ये होऊ घातलेल्या शरद पवारांच्या सभेला आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्याला अमित देशमुखांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


No comments:

Post a Comment