१८ डिसेंबर २०२२ रोजी एकुलत्या एक मुलाचे लग्न असल्याने तट यांच्या घरात आनंदाने तयारी सुरू होती. नातेवाईकांना लग्नाचे आमंत्रण दिले गेले, पण नवरदेव असलेल्या धीरज वसंत तट याला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. यात उपचाराला घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्याच्या लग्नाचं आमंत्रण मिळालं, त्याच्याच अंत्यविधीसाठी यावं लागण्याची दुर्दैवी वेळ नातेवाईकांवर आलीय. लग्नाच्या आनंदात असलेल्या कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अंबाजोगाई शहरातील बँक कॉलनी परिसरात आपेगाव येथील तट कुटुंब वास्तव्यास आहे. स्थापत्य अभियंता असलेल्या धीरज वसंत तट या एकुलत्या एक मुलाचे लग्न जमलं होतं. लग्नाचा मुहूर्त १८ डिसेंबरला ठरला होता. लग्न काही दिवसांवर येऊन ठेपल्याने घरात लगीन घाई सुरू झाली. सर्वजण आनंदात होते. काही नातेवाईकांना लग्नाचे आमंत्रण पोहोचले होते. परंतु नियतीला काही औरच मान्य होतं.
अवघ्या काही दिवसांवर आलेलं लग्न आणि त्यासाठी चालू असलेली घरातली लगबग आणि तयारी, घरातील लोकांनी घरात सून येणार म्हणून अनेक स्वप्न रंगवली, अनेक गोष्टींची तयारी केली मात्र नियतीने घातलेला हा घाट कोणालाच समजला नाही.
अवघ्या काही दिवसावर आलेल्या आपल्या मुलाच्या लग्नाच्या लगबगीत असणारे सर्वच कुटुंब अचानक त्याच मुलाचा मृत्यू व्हावा याच्या इतकं मोठं दुर्दैव कोणाचं नाही. मात्र ज्या मुलीने लग्नासाठी स्वप्न रंगवले होते, काही दिवसातच त्याची जीवन संगिनी होणार होती, मात्र संसार उभा होण्याआधीच मोडला असल्याने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि पूर्ण बीड जिल्ह्यात या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जाते.
No comments:
Post a Comment