मुंबई (प्रतिनिधी) देशात सध्या गुजरात निवडणूकिंच वारं जोरात वाहत असून, देशातील विविध राज्य आणि महाराष्ट्रातील अनेक मंत्री व लोकप्रतिनिधी या निवडणुक प्रचाराच्या कामात व्यस्त आहेत. राज्यातील असेच काही मंत्री व लोकप्रतिनिधी हे महाराष्ट्राच्या कारभारला काहीसा थांबा देऊन, गुजरात निवडुकीत व्यस्त झाले आहेत. मात्र यावर मुंबई विशेष न्यायालयानं तीव्र शब्दात ताशेरे ओढले असून, कोरोना काळातील टाळेबंदीदरम्यान वाढीव वीज बिलाचा मुद्द्यावरून आंदोलन केल्याप्रकरणी महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा न्यायलायन चांगलच झापलं आहे.
न्यायालयाने म्हणटले आहे की, एखादा खटला न्यायप्रविष्ट असताना गुजरात निवडणुकीच्या कामासाठी जाणं हे तुमचं अधिकृत काम आहे का?, असा संतप्त सवाल न्यायालयानं सभापती आणि मंत्र्यांना उद्देशून केला आहे. तसेच आणखी किती दिवस अनुपस्थितीत राहणार आहात? अशी विचारणाही त्यांच्या वकिलांकडे न्यायालयानं केली आहे.
No comments:
Post a Comment