किल्ले धारूर (प्रतिनिधी) - किल्ले धारूर शहरातील हुतात्मा स्मारक हे एक शहराच्या वैभवाचे ठिकाण आहे व त्याकडे नगरपरिषद दुर्लक्ष करत आहे हुतात्म्यांच्या स्मरणात बांधलेते स्मारकाकडे नगरपालिकेची दुर्लक्ष होत असल्याकारणाने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे गाजर गवताने हुतात्मा स्मारकाची झाली वाईट दशा. शहरांमध्येही ठीक ठिकाणी पाणी साचून घाणीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो
शहरांमध्ये ऐतिहासिक वैभव मोठ्या प्रमाणात आहे पण त्या वैभवाकडे नगरपरिषद दुर्लक्ष करत आहे शहरांमध्ये हुतात्मा स्मारक हे प्रेरणादायी स्मारक म्हणून ओळखले जाते पण या स्मारकाकडे नगरपरिषद दुर्लक्ष करत आहे त्यामुळे तेथे गाजर गवताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झालेले असून तेथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता झाली आहे त्यामुळे नागरिकांना तेथे वावर करता येत नाही तसेच अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढली आहे एकेकाळी त्याठिकाणी शहरातील लहान -मोठ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात चहल -पहल दिसत लहान मुला-मुलीसाठी फिरण्याचे ठिकाण होते पण या अस्वच्छतेमुळे तिकडे नागरिक फिरकत नाहीत मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायची पण आता ते पाहावयास मिळत नाही कारण तेथे एवढे गाजर गवत झाले आहे की तेथे सापची ही भीती होऊ शकते व एवढ्या गाजर गवतामुळे कुणाला तिथे जाता पण येत नाही व नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करत आहे यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे याकडे नगर परिषदेने लक्ष देऊन हुतात्मा स्मारक स्वच्छ करून नागरिकांना ,लहान मुलांचा वावर वाढण्यासाठी लवकरात लवकर साफसफाई करून घ्यावी तसेच शहरामध्ये सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य वाढले आहे यामुळे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे नागरिकांची मागणी आहे की लवकरात लवकर हुतात्मा स्मारक चा परिसर व शहरातील साफसफाईचे काम लवकरात लवकर हाती घेऊन करावे नागरिकातून अशी मागणी होत आहे
Friday, September 25, 2020
नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे हुतात्मा स्मारकाची वाईट अवस्था.शहर झाले घाणीचे माहेरघर.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment