Wednesday, January 28, 2026

पालकमंत्री अजितदादांनी बारामतीनंतर परळीवर प्रेम केलं.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमानाचा अपघातात  मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये येत असताना अजित पवारांचा हा अपघाती मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व बडे नेते बारामतीत दाखल झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांना अश्रू आनावर झाल्या आहेत. आज आमचा सह्याद्री कोसळला आहे. बारामतीनंतर अजित पवार यांनी परळीवर प्रेम केल्याच्या भावना परळीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. 

 अपघात नेमका कसा झाला?


1. सकाळी 8.10 मिनिटं

मुंबईतून लियरजेट 45 XR विमानाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीकडे उड्डाण झालं. त्यामध्ये अजितदादांसह पाच जणांचा समावेश होता.

2. सकाळी 8.40 मिनिटं

विमान बारामती एअरस्ट्रीपच्या अगदी जवळ होतं, त्यावेळी विमानात काही तांत्रिक बिघाड झाला.

3. सकाळी 8.46 मिनिटं

तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण सुटलं आणि बारामतीतील गोजुबावी परिसरातील शेतात विमान कोसळलं. त्यामध्ये अजित पवारांसह सर्व जणांचा मृत्यू झाला. 

विमानात कोण कोण होते?


अजित पवार
विदीप जाधव
पिंकी माळी
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक 

विमान अपघाताचा घटनाक्रम

पुणे-बारामती परिसरात दाट धुके, दृश्यमानता अत्यंत कमी होती.  
बारामतीचे विमानतळ लहान आहे आणि त्याच्याकडे ILS (Instrument Landing System) सुविधा नाही.  
त्यामुळे पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली.  
विमानाने रनवेवर थेट प्रवेश केला नाही, तर मोठा वळसा घेतला.  
याचा अर्थ पहिला लँडिंग प्रयत्न रद्द (aborted) केला गेला.  
धुक्यात रनवेवर (align) करणे कठीण झाले.  
दुसरा लँडिंग प्रयत्न केला गेला.  
याचवेळी पायलटने MAYDAY कॉल जारी केला.  
DGCAच्या सूत्रांनुसार, हे टेबल-टॉप रनवे आहे.  
लँडिंगदरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले.  
सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचा तोल गेला.  
रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळले.
विमान जमीनीवर आदळल्यावर मोठा स्फोट झाला, त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले.
 त्यानंतर विमानात भीषण आग लागली.
आगीमुळे तात्काळ बचावकार्य शक्य झाले नाही.
अपघाताचा तपास चालू आहे, DGCA अहवालानंतर अंतिम कारण निश्चित होईल.

No comments:

Post a Comment