परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राज्यात व देशात लव जिहादच्या घटना सातत्याने घडत आहेत. यासाठी कठोर कायदा असावा तसेच धर्मांतरणाला ही बंदी घातली पाहिजे.लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोध कायदा करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी 29 डिसेंबर रोजीज परळी वैजनाथ येथे हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.
जबरदस्तीने असो किंवा मर्जीने कोणत्याही प्रकारचे धर्मांतरणास परवानगी नसावी. प्रत्येकाने आपापल्या धर्माचे पालन करावे व इतर धर्मामध्ये ढवळाढवळ करु नये. तसेच लव जिहाद च्या नावाखाली अनेक तरुणींना फसवून, नादाला लावून पुन्हा हत्या केल्या गेल्या आहेत. त्यांच्या गुन्हेगाराना तातडीने फाशी देण्यात येण्यासाठी कठोर कायदा करावा या मागणी साठी समस्त हिंदू समाजाचा मुकमोर्चा गुरूवार दि 29 डिसेंबर रोजी राणी लक्ष्मीबाई टॉवर पासून निघून तहसील कार्यालय परळी पर्यंत निघणार आहे.
या मोर्चास समस्त हिंदू बंधु भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समस्त हिंदू समाजाकडून करण्यात आले आहे.
● *असा असेल मोर्चाचा मार्ग....*
या मोर्चाची सुरूवात राणी लक्ष्मीबाई टॉवर ते बाजार समिती ते एकमिनार चौक ते बस स्टँड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवान बाबा चौक ते तहसील पर्यंत जाईल. प्रशासनाला निवेदन देऊन मोर्चाचा समारोप होणार आहे.
No comments:
Post a Comment