Thursday, April 16, 2026

राज्यातील पाच बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या दोन आठवड्यांत तिसरी वेळ.

मुंबई : राज्यातील पाच बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. बुधवारी सायंकाळी पाच वाजता त्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. मागील दोन आठवड्यांत राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ही तिसरी वेळ आहे.

राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा या आठवड्यात देखील कायम राहिली आहे. फडणवीस यांनी राज्याचे सूत्रे हातात घेतल्यापासून कॅबिनेट बैठकीच्या दिवशी वा आसपास आठ-दहा अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी होतात. या आठवड्यात देखील बदल्यांची परंपरा कायम राहिली आहे.

कोणत्या अधिकाऱ्यांच्या कुठे बदल्या?

१. डॉ. बी. एन. पाटील (आयएएस: नॉन-एससीएस: २०१४), संचालक, पर्यटन, मुंबई यांची प्रकल्प संचालक, रुसा, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई येथे बदली झाली आहे.

२. श्री मंगेश जोशी (आयएएस: एससीएस: २०१५), उपमहासंचालक, यशदा, पुणे यांची संचालक, पर्यटन, मुंबई येथे बदली झाली आहे.

३. श्री कुलदीप जंगम (आयएएस: आरआर: २०२०), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी येथे बदली झाली आहे.

४. श्री कुशल जैन (आयएएस: आरआर: २०२२), प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, अहेरी आणि सहायक जिल्हाधिकारी, अहेरी उपविभाग, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर येथे बदली झाली आहे.

५. श्री रेवैया डोंगरे (IAS:RR:2023) सहायक जिल्हाधिकारी, भूम उपविभाग, धाराशिव यांना प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment