

26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जनतेला संबोधीत करताना सांगितले की कोरोनाचे संकट हळूहळू दूर होत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे .जिल्ह्यात चार ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून दोन हजार पेक्षा जास्त डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे .

समाजकल्याण विभागाच्या वतीने वंचित,दिन दलित घटकापर्यंत विकास पोहचवण्याच काम महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सुरू आहे .तळागाळातील शेवटचा माणूस सुखी झाला पाहिजे यासाठी आम्ही काम करत आहोत .

बीड जिल्ह्यात पीकविमा,फळपीक विमा तसेच कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकरी सुखी झाला पाहिजे यासाठी प्रशासन आणि शासन कार्यरत आहे .जिल्ह्यातील वंचित घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे .

यावेळी राष्ट्रपती पदक प्राप्त जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आर रामस्वामी यांचा मुंडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला .तसेच विविध ग्रामपंचायत ,शिक्षक,पोलीस कर्मचारी, विद्यार्थी यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला .

या कार्यक्रमास बीड चे आमदार संदिप क्षीरसागर, आ संजय दौड ,जिल्हाधिकारी आर एस जगताप यांच्यासह अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते .पालकमंत्री मुंडे यांनी ध्वजारोहण झाल्यानंतर पोलीस दलाची सलामी स्वीकारली .
No comments:
Post a Comment