याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या 30 लोकांविरुद्ध सोमवारी पहाटे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. धिंगाणा घालणाऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके नियुक्त करण्यात आल्याची माहिती परळी शहर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहिफळे यांनी दिली.
दोन गटाचा तूफान राडा.
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर रविवारी बाजारात महिलांची गर्दी असतानाच अचानक काही लोकांनी दुकानात घुसून एकास जबर मारहाण केली. यावेळी सोडवासोडवी करण्यास गेलेल्यासही या जबर मारहाण केली. याबाबत काहींनी पोलीसात तक्रार करण्यास गेले असता त्यांची तक्रार घेतली नाही. यामुळे बराच गोंधळ झाला. दरम्यान याचवेळी एक गट हल्ला करण्याचा प्रयत्न करत असताना दुसर्या गटाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन गटांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक झाली. याचवेळी नेहरू चौक भागातील वाहनांचीही मोडतोड करण्यात आली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र मनुष्यबळ कमी असल्याने त्यांचे प्रयत्न कमी पडू लागले.
पोलिसांनी शहरात वाहने फिरवून शांततेचे आवाहन केले.
पोलिसांनी अथक प्रयत्न करून प्रकरणावर नियंत्रण ठेवले.रविवारी रात्री यांनी उद्धव कुंभार यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यावरून 15 जणा वीरोधात तर पोलिसांच्या फिर्यादी वरून 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता शहरात शांतता आहे.
No comments:
Post a Comment