नवी दिल्ली :देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभुमीवर 'लॉकडाऊन ४' हा ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पण ही आकडेवारी काही कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीत. त्यामुळे देशातील लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भातील कोणतेही अधिकृत विधान केंद्राकडून आले नाही. आतापर्यंतची कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि ४ लॉकडाऊन पाहता लॉकडाऊन ५ हा १५ जूनपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.केंद्र आणि राज्य सरकार मिळून लॉकडाऊन ४ चे परिक्षण करत आहेत.
गृह मंत्रालय देखील राज्य सरकारांसोबत ताळमेळ राखत यावर लक्ष ठेवून आहे. सर्व राज्यांकडून लॉकडाऊन ४ संदर्भातील अहवाल मागितला जाणार आहे. या अहवालानंतर केंद्र सरकार निर्णय घेऊ शकते.लॉकडाऊनमध्ये देश रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागला गेलाय. रेड झोनमधल्या नागरिकांसाठी सवलती नसल्या तरी ग्रीन झोनमध्ये सरकारने शिथीलता दिली आहे. त्यामुळे इथे दुकान, ग्रीन झोन अंतर्गत प्रवासास मुभा आहे. देशात विमान सेवा देखील सुरु झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन ५ सुरु झालं तरी जनतेचा आत्मविश्वास कसा वाढेल ? याकडे सरकारचे लक्ष असणार आहे.
No comments:
Post a Comment