राज्य सरकारने गणेशोत्सव काळात गणेश मंडळासाठी विविध पुरस्कार स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये सांस्कृतिक, ऐतिहासिक, आरोग्य, सामाजिक जनजागृती या विषयावर देखावे सादर करणाऱ्या मंडळाना पुरस्कार जाहीर केले होते.
जिल्हा आणि राज्य पातळीवर ही स्पर्धा आयोजित केली होती. बीड जिल्ह्यातून धारूर येथील जय किसान गणेश मंडळाला प्रथम पुरस्कार पन्नास हजार रुपये, द्वितीय पुरस्कार चाळीस हजार रुपये अंबाजोगाई च्या सरस्वती गणेश मंडळास आणि तृतीय तीस हजार रुपयांचा पुरस्कार बीडच्या राष्ट्रीय गणेश मंडळास जाहीर झाला आहे.
No comments:
Post a Comment