Wednesday, February 12, 2025

संसाराच्या मोहजलामध्ये जरूर गुंता पण भगवंताला विसरू नका - ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  मानवी जीवनामध्ये अनेक समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी माणूस संसाराच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. समस्या सोडविता सोडविता त्या मोह झाला मध्ये तो एवढा गुंतून जातो की ज्यांनी कर्म करण्यासाठी जन्माला घातले त्या भगवंतालाच विसरून जातो म्हणून माणसाने संसाराच्या मोजायला मध्ये जरूर अडकावे पण भगवंताचे नामस्मरण व भगवंताला विसरू नये. असा उपदेश बाल कीर्तनकार  ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे यांनी श्रोत्यांना केला.
परळी तालुक्यातील मौजे पौळ पिंपरी येथील कै. सीताबाई मुंजाभाऊ काळे यांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्त आज मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी आयोजित कीर्तन सोहळ्यामध्ये बाल कीर्तनकार  ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे संगमकर या उपदेश करीत होत्या. प्रारंभी कै. सीताबाई मुंजाभाऊ काळे यांच्या प्रतिमेचे पूजन ज्ञानोबा काळे बालासाहेब काळे व लक्ष्मण काळे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा "शेवट तो भला !माझा बहु गोड झाला!! आलो  निजाच्या माहेरा ! भेटी रखुमाईच्या वरा" !! हा अभंग किर्तन सेवेसाठी घेण्यात आला होता. या कीर्तन सोहळ्यासाठी गायनाची साथ‌संगत ह.भ.प. बब्रुवान महाराज गिराम, अश्विनीताई बडे, अरविंद महाराज काळे, मौजे पौळ पिंपरी व पंचक्रोशीतील भजनी मंडळ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना बाल कीर्तनकार  ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे म्हणाल्या की, माणसाने संसारामध्ये गुंरफटताना  आपली अलिप्तता नारळाच्या खोबऱ्याप्रमाणे आणि चिकू मधील बिया प्रमाणे सांभाळावी. गरांमध्ये राहून ही चिकूचा बी अंगाला गर लागू देत नाही. नारळाच्या टणक कवचाचा आधार घेत खोबरे आतमध्ये आनंदात जीवन कंठत असते अशाप्रकारे मानवाने ही जीवन जगावे अशी अपेक्षाही बाल कीर्तनकार  ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment