*बीड जिल्ह्यातील जिजाऊ, साईराम, ज्ञानराधा, राजस्थानी, मराठवाडा अर्बन, द्वारकादास नागरी यासह इतर मल्टीस्टेट बँकांनी गतवर्षी गाशा गुंडाळून कोट्यावधी रुपयांच्या ठेवी बुडविल्या आहेत.
बीड जिल्ह्यातील जिजाऊ, साईराम, ज्ञानराधा, राजस्थानी, मराठवाडा अर्बन, द्वारकादास नागरी यासह इतर मल्टीस्टेट बँकांनी गतवर्षी गाशा गुंडाळून कोट्यावधी रुपयांच्या ठेवी बुडविल्या आहेत. या सर्व बँकांमध्ये ठेवी परत मिळाल्या नसल्याने ठेवीदार आक्रमक झाले असून गेल्या अनेक दिवसांपासून ठेवीदार मल्टीस्टेट बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. आपल्या हक्काचे पैसे मिळावे; अशी मागणी करत शेकडो ठेवीदार रस्त्यावर उतरले आहेत. मल्टीस्टेट बँकेच्या संचालकांनी ठेविदारांचे पैसे न दिल्यास तीव्र लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला.
दहा दिवसांची मुदत
दरम्यान ठेवीदारांच्या सुरु असलेल्या आंदोलनस्थळी पतसंस्थाचे प्रतिनिधी आले होते. त्यांनी दहा दिवसाची मुदत मागितल्यानंतर ठेवीदारांच्यावतीने ती देण्यात आली असून ही मागणी मान्य न झाल्यास आता थेट आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी संघटनेचे सचिन उबाळे यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment