बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात सर्वाधिक बालविवाह होत असल्याची नोंद शासन दरबारी आहे. हीच वाढत असणारी आकडेवारी कमी करण्यासाठी प्रशासन आणि चाईल्ड लाईन कामाला लागले आहेत. या मे महिन्याच्या ३० दिवसांमध्ये तब्बल ३७ बालविवाह रोखण्यात चाईल्ड लाईन आणि प्रशासनाला यश आले आहे
सध्या ऊस तोडीवरून कामगार हे आपल्या गावी परतले आहेत. त्यामुळे बालविवाह करण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे आता प्रशासन हे चाईल्ड लाईनच्या मदतीने ग्राउंडवर फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. जिथं माहिती मिळेल तिथं जाऊन संबंधित पालकांचे समुपदेशन करून हे होणारे बालविवाह रोखण्यात येत आहेत.
आजही रोखला विवाह
बीड जिल्ह्यात आज देखील एक होणारा बालविवाह चाईल्ड लाईनचे तत्त्वशील कांबळे आणि ग्रामसेवकाने रोखला आहे. दरम्यान बालविवाहाची भीषणता बीड जिल्ह्यात पाहायला मिळत असताना आता बालविवाह रोखण्यात प्रशासनाने चाईल्ड लाईनच्या मदतीने पाऊल उचललं असल्याने बालविवाहाची आकडेवारी कमी होण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment