*गिझरमधून तयार झालेल्या विषारी वायूमुळे गुदमरून जोडप्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुंबईतील घाटकोपर येथे राहणारे दीपक शहा (40 वर्ष) आणि टीना शहा (35 वर्ष) यांचं काही दिवासांपूर्वीच लग्न झाले होते. घाटकोपर येथील कुकरेजा टॉवरमध्ये हे जोडपं भाड्याच्या घरात राहत होतं. याच टॉवरमध्ये त्यांचे काही नातेवाईकही राहत होते. होळीच्या दिवशी या जोडप्याने कॉलनीत सर्वांसोबत होळी खेळली.
यानंतर दोघेही आंघोळीसाठी त्यांच्या घरी आले. बराच वेळानंतरही दोघे जेवायला न आल्याने नातेवाईक त्यांना बोलवण्यासाठी त्यांच्या फ्लॅटवर गेले. बराच वेळ दरवाजा ठोठावल्यानंतर आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर दोघांच्याही मोबाईलवर नातेवाईकांनी कॉल केले. मात्र कुणीच कॉल उचलला नाही.
त्यानंतर नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी डुप्लिकेट चावीने फ्लॅट उघडला तेव्हा फ्लॅटच्या बाथरूममध्ये पती-पत्नी बेशुद्ध पडलेले आढळले. दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पंतनगर पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे
No comments:
Post a Comment