Sunday, January 29, 2023

कामगार भजन स्पर्धेचे शानदार उद्घाटनभजन हे सामाजिक संस्कार निर्माण करणारे माध्यम- प्रधान सचिव विनिता वेद- सिंगल.


*कामगारांच्या जीवनात भजन आनंद फुलविते- कल्याण आयुक्त रविराज इळवे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : भजन हे ईश्वराशी संवाद साधण्याचा मार्ग आहे. भजनामुळे सामाजिक संस्कार निर्माण होते. समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा नष्ट करण्याचे मोठे माध्यम भजन असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात भजनाला प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद -सिंगल यांनी केले.
त्या  राज्यस्तरीय भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
 यावेळी व्यासपीठावर लोकमत मीडिया प्रायव्हेट लि. चे मानव संसाधन विभागाचे उपाध्यक्ष बालाजी मुळे, दै. सकाळचे निवासी संपादक दयानंद माने, सहाय्यक कामगार आयुक्त युवराज पडियाल, कल्याण आयुक्त रविराज इळवे, सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांची उपस्थिती होती.
 तणाव कमी करण्यासाठी भजन करणे गरजेचे असून, दुःख पेलण्याचे सामर्थ्य ही भजनामुळे  माणसात निर्माण होते. भजनाचे संस्कार प्रत्येकाने आपल्या मुलांना द्यावे असे आवाहन विनिता-वेद सिंगल यांनी केले. राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल कल्याण आयुक्त रविराज इळवे यांचे  भरभरून कौतुक ही यावेळी त्यांनी केले. 
पांडुरंगाचे नामस्मरणाने  नैतिकता निर्माण होऊन माणसाच्या आयुष्यात बदल होते, असे यावेळी  बालाजी मुळे म्हणाले. दयानंद माने,  युवराज पडियाल यांनी मनोगत व्यक्त केले.

*कामगारांच्या जीवनात भजन आनंद फुलविते- कल्याण आयुक्त रविराज इळवे. 

कामगारांच्या जीवनात भजनामुळे आनंद फुलते, आनंद फुलवण्याचे कार्य कामगार कल्याण मंडळ करत असल्याने मला समाधान असल्याचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यावेळी प्रस्ताविकात म्हणाले.
 या स्पर्धेची  सुरूवात लातुर येथील भजनी संघाच्या सादरीकरणाने झाली. दोन दिवसीय स्पर्धेत महिला व पुरुष यांचे ३८ भजनी संघाचे सादरीकरण होणार आहे.
 प्रस्ताविक विजय अहिरे यांनी केले आभार सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी मानले. 



No comments:

Post a Comment