जिल्ह्यातील 704 ग्राम पंचायतींच्या निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान आहे. यावेळी सरपंच निवड थेट जनतेतून आहे. त्यामुळे चुरस तर वाढलीच आहे. शिवाय इच्छुकांच्या संख्येतही भर पडली. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या दरम्यान सदस्य पदांसाठी 19 हजार 784 तर सरपंचपदासाठी 4 हजार 255 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. 6 डिसेंबरला छाननी प्रक्रिया पार पडली.
२२० अर्ज बाद
सरपंच व सदस्यपदाचे 220 अर्ज बाद झाले असून एकूण 23 हजार 468 अर्ज वैध ठरले आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा 7 डिसेंबर हा शेवटचा दिवस होता. यामध्ये 37 ठिकाणच्या ग्रामपंचायतचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत.
No comments:
Post a Comment