Monday, November 28, 2022

परळी विधानसभा मतदारसंघातील धरणाचे पाणी शेतकऱ्यांना कधी मिळणार ;- वसंत मुंडे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे सर्व धरणे भरलेले आहेत त्यामध्ये बीड जिल्हा अंतर्गत परळी विधानसभा मतदारसंघातील खरीप पिकासाठी पाणी सोडण्या संदर्भात कोणताच निर्णय झालेला नाही असा आरोप ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला . सर्व शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्या केलेल्या आहेत. ‌महाराष्ट्र सरकारने पालकमंत्री लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाचे कर्मचारी यांच्यावर जबाबदारी ४ नोव्हेंबरला २०२२ ला शासनाने आदेश दिलेले आहेत .परंतु जिल्हास्तरावर कालवे  दुरुस्ती, करून जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अजूनही प्रशासकीय पातळीवर हालचाल दिसत नाही. सिंचन व्यवस्थापन समितीने सदरचे कालवे दुरुस्ती व सिंचन निधी यासंदर्भात यंत्रणेने कडून कारवाई झाली नसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला. बहुतांश धरणे भरल्यामुळे शेतकरी आनंदात असून रब्बीला पाणी सुटेल अशी अपेक्षा आहे , परंतु लोकप्रतिनिधी ,पालकमंत्री , जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाचे संबंधित अधिकारी बीड जिल्ह्यातील निष्क्रिय आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणावर पाणी धरणात असूनही शेतीसाठी उपयोगी नाही त्यामुळे नाराजीचा सूर आहे. शेतकरी पाणीपट्टी भरायला तयार असूनही जलसंपदा विभागाकडून कारवाई करण्यात येत नाही.कालवा सल्लागार समितीच्या बैठक होत नाही, खूप मोठ्या प्रमाणावर विटभटयामुळे  कालवे तोडफोड केलेले आहेत, शेतकऱ्यांची परळी विधानसभा मतदारसंघात रब्बीच्या पिकासाठी पाण्यासंदर्भात मागणी आहे कारण वाण, कासारवाडी, धर्मापुरी, दैठणा दौंडवाडी, अंबलवाडी,भंडारवाडी, चांदापूर, धरण भरलेले असून इतर छोटे मोठे धरण भरलेले आहेत परंतु पाण्याचे नियोजन नसल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांना रब्बीला पाणी मिळते का नाही हा प्रश्न खरा उपस्थित झालेला आहे,यावर काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाकडे पाणी सोडण्यासंदर्भात रब्बीसाठी तात्काळ नियोजनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे, त्यावर शासनाकडून क्रमांक: संकीर्ण_२०२२प्र. क्र. ४४६/२२सिंवय( कामे) दि. १७/ ११/ २०२२ ने आदेश मा.कार्यकारी संचालक गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद यांना दिलेले आहेत. तात्काळ अंमलबजावणी  शासन स्तरावर कारवाई करून अहवाल सादर करण्यासंदर्भात कळविले आहे.परंतु जलसंपदा विभागाकडून आज तागायत कसली हालचाल झालेली नाही, त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी मिळते का नाही? त्यास जबाबदार लोकप्रतिनिधी व कर्मचारी आहेत असा आरोप काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी केला .

No comments:

Post a Comment