राज्यात कोरोना हातपाय पसरत असताना, राज्यात 13 जूनपासून शाळा सुरु होत आहेत. मात्र, त्याच वेळी कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने यंदा तरी शाळा सुरु होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झालाय. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज (रविवारी) महत्वाची माहिती दिली.
शाळांसाठी ‘एसओपी’ जारी करु..
येत्या 13 जूनपासून राज्यातील शाळा सुरु होत आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शाळांसाठी ‘एसओपी’ (SOP) जारी करण्यात येईल. शाळांमध्ये मास्क सक्ती करायची की नाही, याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. तसेच शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नवी कोविड नियमावली जारी करु, असे शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या..
कोरोना वाढत असल्या, तरी पुन्हा शाळा बंद करणं योग्य नाही.. सध्या मास्क सक्ती नसली, तरी मास्कबाबत पुन्हा एकदा जनजागृती करावी लागणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून मास्क वापरावा, असं आवाहन गायकवाड यांनी केलं.

No comments:
Post a Comment