____
बीड (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील म्हाळसजवळा येथील मंडळ आधिकारी स्व. नितिन जाधव यांच्या संशयास्पद अपघात प्रकरणात पोलीस उपअधिक्षक पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड पोलीस अधिक्षक बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, महसुल मंत्री, गृहमंत्री, विभागीय आयुक्त यांना केली असून संबधित प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सविस्तर माहीतीस्तव
__
०६ मार्च २०२२ रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास बीडचे प्रभारी तहसिलदार सुरेंद्र डोके व म्हाळसजवळा ता.जि.बीड येथील मंडळ आधिकारी नितिन जाधव यांच्या गाडीचा सावळेश्वर फाटा याठीकाणी अपघात झाल्याचे व त्या दुर्देवी घटनेत मंडळ आधिकारी नितिन जाधव यांचा जागीच मृत्यु व तहसिलदार सुरेंद्र डोके जखमी झाले होते, दोघेही राक्षसभुवन, सावळेश्वर, म्हाळसपिंपळा येथे अवैध वाळु वाहतुक विरोधात कारवाईसाठी गस्त घालणा-या पथकात असल्याचे दैनिकात प्रसिद्ध झालेले असून गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे विविध दैनिकातुन प्रसिद्ध झाले आहे.
संबधित प्रकरण संशयास्पद असुन अपघात की घातपात याविषयी सर्वसामान्य माणसांमध्ये शंका असुन तहसिलदार सुरेंद्र डोके यांनी राक्षसभुवन येथे जाण्यापुर्वी शासकीय नियमानुसार वरिष्ठांची परवानगी घेतली होती का?? गस्ती पथकामध्ये गेले होते तर मग शासकीय वाहनाद्वारे प्रवास न करता खाजगी वाहनाने प्रवास का??तहसिलदार डोके यांनी अपघाताची कल्पना वरिष्ठांना दिली होती का?? बीड जिल्हा रूग्णालयात सर्व सुविधा असताना पुण्याला त्यांना का हलवण्यात आले या सर्व गोष्टी संशयास्पद असुन संबधित प्रकरणात पोलीस उपअधिक्षक पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच
तहसिलदार सुरेंद्र डोके यांच्या मोबाईलचे सीडीआर व टोलनाक्यावरील वाहनांचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे
____
तहसिलदार सुरेंद्र डोके यांचे त्या दिवशीचे सीडीआर तपासण्यात यावेत तसेच पाडळशिंगी टोलनाक्यावरील आवक जावक वाहनांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येऊन
व संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक कार्रवाई करण्यात यावी.
लेखनीबंद आंदोलन पुकारणारे महसुल प्रशासन नितिन जाधव मृत्युप्रकरणात मुग गिळुन गप्प का??
____
बीड जिल्ह्य़ातील वाळुमाफियांचे काही जिल्हाप्रशासनातील आधिका-यांसोबत हितसंबंध तसेच गटतटातुन वाळुमाफियांचा महसुल प्रशासनातील आधिका-यांवर हल्ला आदि पुर्वीच्या घटना पाहता लेखनीबंद आंदोलन करणारे महसुल प्रशासनातील आधिकारी स्व. नितिन जाधव मृत्युप्रकरणात गप्प का??असा प्रश्न नागरीखांना पडला आहे
No comments:
Post a Comment