Wednesday, March 2, 2022

पब्जी खेळताना मित्राचा चाकु सुरी चे वार करून केली हात्या.आई वडिलांचा होता एकुलता एक मुलगा!!


ठाणे: ठाण्याच्या वर्तकनगर परिसरात मोबाईलवरील खेळणे चांगलेच महागात पडल्याची घटना घडली आहे. पब्जी खेळत वारंवार अधिकाधिक मोहरे टिपत जिंकत असल्याचा राग मनात धरून आपल्या २० वर्षीय मित्राचा मित्रांनीच खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मित्राचा खून करण्यात मुख्य आरोपीसह दोन अल्पवयीन तरुणांचा समावेश आहे. या तिघांवर वर्तकनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने ६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, इतर दोन अल्पवयीन आरोपींना भिवंडी बाल न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. ( friends end the life of friend in real life in of thane) ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील जानकादेवी नगर, जुनी पाईपलाईन परिसरात राहणारा साहिल जाधव हा २० वर्षीय तरुण मोबाईल पब्जी खेळात चांगलाच तरबेज होता. नेहमीच जास्त किल्स मिळवून तो सतत जिंकत असे. याच कारणावरून साहिल आणि त्याच्या साठीदारांमध्ये नेहमीच वाद होत असे. याचाच राग मनात धरून त्याच्यासोबत पब्जी खेळ खेळत असलेल्या त्याच्या साथीदारांनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले.
चाकूने केले सपासर वार साहिलच्या तीन मित्रांनी त्याला घराजवळ असलेल्या गल्लीजवळ गाठले आणि त्याच्या अंगावर चाकू सुरीच्या सहाय्याने सपासप वार करून पळ काढला. या प्रकरणी या तीनही आरोपींच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्तकनगर पोलिसांनी साहिलची हत्या करणाऱ्या तिनही जणांना अटक केली आहे. प्रणव प्रभाकर माळी (१९), राहुल महादेव गायकवाड (१७), गौरव रवींद्र मिसाळ (१७) अशी या तीनही आरोपींची नावे आहेत.
यामध्ये प्रणव माळी हा मुख्य आरोपी असून इतर राहुल आणि गौरव हे दोघेही अल्पवयीन आहेत. प्रणव माळी याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर दोन आरोपी राहुल आणि गौरव हे अल्पवयीन असल्याने त्यांना भिवंडी येथील बाल न्यायालयात हजर करण्यात आले असता बाल न्यायालयाने या दोघांची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. या संपूर्ण प्रकरणात प्रणव प्रभाकर माळी हा मुख्य आरोपी आहे. त्याच्या विरोधात या आधी देखील मारहाण केल्याचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर इतर दोन अल्पवयीन आरोपींना ही कस्टडीमध्ये घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे वर्तकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम सांगितले.

एकुलत्या एक मुलाची हत्या

साहिल जाधव हा आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे आई वडील हे दोघेही मध्यमवर्गीय घरचे असून कामानिमित्त बाहेर असतात. साहिलची आई ही घरकाम करते आणि वडील हातगाडी लावून आपल्या घरचा उदरनिर्वाह करतात. मात्र त्यांच्यात्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या हत्येनंतर त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. मात्र कामानिमित्त व्यस्त असलेल्या अशा पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे असून मुलगा नेटवर्किंगचा गैरवापर करून पोर्न साईट किंवा पब्जी सारखे खेळ खेळात नाही ना, त्याच्या आहारी जात नाही ना याकडे देखील लक्ष दिले पाहिजे असे आवाहन देखील वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम केले आहे.


No comments:

Post a Comment