Monday, November 8, 2021

बीड जिल्ह्यासह परळी मतदारसंघच्या अनेक प्रश्नामुळे नागरीक त्रस्त.पालकमंत्री मात्र सपना चौधरीच्या नाचगाण्यात व्यस्त.

      
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालीआहे. बीड जिल्ह्या त्याला अपवाद राहिला नाही, जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतीतील पिके पूर्णपणे उध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. परळी तालुक्याचा विचार केला तर मागच्या एक महिन्यात जवळजवळ 4 चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यानंतर सध्या एस.टी.कामगारांचे परळी मध्ये आंदोलन चालू आहे.आधार देण्याची गरज असणारे असे अनेक प्रश्न असताना बीड जिल्ह्याचे पालक मंत्री सपना चौधरी चा नाच गाण्याचा कार्यक्रम घेतात ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे जनतेतुन बोलले जात  आहे. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा  पिक विमा तुटपुंजा रकमेत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला पूर्ण अनुदान पिक विमा अजून भेटला नाही असे असताना सपना चौधरीच्या नाच गाण्याचा कार्यक्रम घेऊन परळीला नेमकं कोणत्या दिशेला नेण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे हा सर्वसामान्य लोकांच्या मनात प्रश्न पडला आहे. आपण बघितलं कोरोणाच्या काळात पूर्णपणे शेतकरी कष्टकरी व्यापारी इतर सर्वसामान्य लोक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. विकासाचं कुठलेही काम सध्या होताना दिसत नाही. परळी मतदारसंघाचा विचार  केला तर फक्त काही कार्यकर्ते जगवण्यासाठी निधी आणि त्यात स्वतःला टक्केवारी घेणे या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा विकास करण्याचं काम या ठिकाणी होताना दिसत नाही. याउलट आपत ग्रस्तांच्या दुःखावर मीठ चोळण्याच काम नाच गाण्याचा कार्यक्रम घेऊन करण्याचा प्रयत्न  होत आहे.यामुळे बीड च्या पालकमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न  चिन्ह निर्माण झाले आहेत अशी चर्चा  जनतेत चालु आहे. 
  

No comments:

Post a Comment