Friday, October 8, 2021

*दिव्य ज्योति जाग्रति संस्थान द्वारा आयोजित सात दिवसीय श्री राम कथेचा लाभ घ्या.*


           प्रभू श्रीराम सृष्टीच्या प्रत्येक कणा-कणात वास करतात आणि त्यांची पवित्र कथा सध्याच्या प्रत्येक समस्येवर एक समग्र उपाय आहे. दिव्य ज्योति जाग्रति संस्थानचे संस्थापक आणि संचालक *दिव्य गुरु श्री आशुतोष महाराज जी* यांचे कथन आहे  - *"श्री रामांची कथा ऐकण्याचे खरे फळ म्हणजे आपल्याला भगवान श्री रामांचे प्रत्यक्ष दर्शन घडते."*

               दिव्य ज्योति जाग्रति संस्थेतर्फे देि.09 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत श्री राम कथेचा एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, जेणेकरून समाजाला श्री रामांची दिव्य कथा श्रवण करावयास  मिळेल. ही कथा केवळ श्री रामांच्या कथांपुरती मर्यादित राहणार नाही, तर श्री रामाला भेटण्याच्या शाश्वत पद्धतीशीही सर्वांना परिचित करून देईल.
             या कार्यक्रचा लाभ जगभरातील सर्व भक्तांना  घेता यावा म्हणून ही पवित्र कथा संस्थेच्या यूट्यूब चॅनेलवर  - डीजेजेएस वर्ल्ड देि.09 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत रोज सकाळी 10 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत प्रसारित केली जात आहे.

         कोविड महामारीमुळे पसरलेल्या नकारात्मकतेमध्ये जनमाणसात दिव्यता व सकारात्मकतेच्या उद्देशाने संस्थेने अद्वितीय डिजिटल कथा महोत्सव  - *ब्रह्म एव शांती:ब्रह्म एव आनंद:* च्या अंतर्गत ही कथा आयोजित केली आहे. या कथेचे वाचन दिव्य गुरु श्री आशुतोष महाराज जींची शिष्या - विश्वविख्यात श्रीराम कथाव्यास - साध्वी श्रेया भारती जींच्या द्वारे केले जाईल. साध्वी जींनी रामचरितमानस मध्ये वर्णित श्रीरामांच्या लीलांमध्ये दडलेल्या गुढ अध्यात्मिक रहस्यांना  उलगडून असंख्य श्रद्धाळूंना भक्तिमार्गाकडे प्रेरित केले आहे.  या विलक्षण डिजिटल कथा महोत्सवाबद्दल अधिक माहितीसाठी, अवश्य भेट द्या - www.djjs.org/katha.

           कथेचे मुख्य आकर्षण पुढील प्रमाणे आहे - भगवान रामांचा अवतार हा उत्सव का आहे? मनरुपी रावणाचा वध कसा करावा ? खऱ्या अर्थाने राम राज्य म्हणजे काय? राम हा माणन्याचा  विषय आहे की जाणन्याचा? अश्या अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांचे उदाहरणासह समाधान भगवान श्री रामांच्या  लीलांचे ज्ञानवर्धक विश्लेषण, देिव्य  गुरू श्री आशुतोष महाराज जींच्या समर्पित युवा शिष्यांद्वारे सुमधुर भजन कार्यक्रम, येजमानांद्वारे  घरी बसल्या डिजिटल पूजा व पवित्र आरती.
 
       भगवान श्री राम संपूर्ण मानवजातीसाठी आदर्श आहेत. आपण ही त्यांच्या गुणांना  आत्मसात करावे हेच या आगामी कथेचे औचित्य आहे.आध्यात्मिक आणि प्रेरणादायी विचारांना नियमित प्राप्त करण्यासाठी  DJJS YouTube चॅनेलची सदस्यता घ्या - http://www.youtube.com/djjsworld आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा.

        दिव्य ज्योति जाग्रति संस्थान ही एक सामाजिक आणि आध्यात्मिक संस्था आहे. जी विश्वात शांतता आणि बंधुत्व प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत आहे. जी आपल्या नऊ मुख्य प्रकल्पांद्वारे समाजात मोठ्या प्रमाणात बदल आणत आहे. हे नऊ प्रकल्प म्हणजे - महिला सशक्तिकरण कार्यक्रम; साक्षरता अभियान; सम्पूर्ण स्वास्थ्य कार्यक्रम; नशा उन्मूलन कार्यक्रम; पर्यावरण संरक्षण कार्यक्रम; भारतीय देशी गो संवर्धन एवं नस्ल सुधार कार्यक्रम; आपदा प्रबंधन कार्यक्रम; बंदी सुधार कार्यक्रम, नेत्रहीन व दिव्यांग सशक्तिकरण कार्यक्रम.

No comments:

Post a Comment