परळी वैजनाथ (प्रतिनिधि) :- बीड जिल्ह्यात १० दिवसाचे लॉकडॉऊन शासनाकडून जाहीर करण्यात आले. या लॉकडॉऊन मध्ये सामान्य लोकांना भरपूर त्रास सहेन करावा लागायला आहे .
त्यात स्वस्त धान्य राशनची एक मोठी समस्या समोर येत आहे काही दुकाने उघडत नाही काही उघडते पण आपल्या वेळेप्रमाणे चालत नाही सामान्य लोकांच्या बोलणा आहे की लॉकडॉऊन मध्ये राशन दुकानदाराला एक मोकळा मार्ग मिळत आहे आणि त्याला भरपूर सूट मिळते.
2020 मध्ये लागलेल्या लॉकडॉऊनात लोकांना खालील प्रमाणे त्रास सहन करावा लागला होता.
१) पावती नाही मिळत होती
२) त्यावेळी जे शासनाने आदेश काढले होते की एक माणसाला पाच किलो तांदूळ ते प्रमाणे नाही मिळत होता
३) राशन दुकानदार राशन धारकांना बरोबर बोलत नव्हते
४) ऑनलाईन प्रमाणे राशन धारकांना माल मिळत नव्हता
आम्ही एस-आय-ओ चे सय्यद उमेर व शेख मुदस्सिर (राशन अक्टिविस्टस परळी) शासनाकडून मागणी करतो की शासनानी परळी तालुक्या साठी या १० दिवसाचा लॉकडॉऊन मध्ये सामान्य लोकांना राशनाची समस्या जे २०२०चा लॉकडॉऊन मध्ये झाली होती ते आता होऊ नये यासाठी शासनाने गंभीरपणे दखल घ्यावी.
No comments:
Post a Comment