Tuesday, December 29, 2020

महाराष्ट्रत महाआघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता, ठाकरे सरकारला धोका - रामदास आठवले


* शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे केले आवाहन, वंचितला एनडीएत येण्याचे दिले निमंत्रण.


औरंगाबाद  दि. 29 (प्रतिनीधी) महाविकास आघाडीत युपीएच्या अध्यक्षपदावरुन वाद सुरु आहे. शिवसेना युपीएच्या घटकपक्ष नसताना शिवसेनेचे नेते संजय राऊत हे शरद पवारांना युपीएच्या अध्यक्षपद देण्याची मागणी पुढे करत आहे. यामुळे शिवसेना व काँग्रेसमध्ये खळखट्ट्याक होईल. काँग्रेसला ही मागणी कदापिही मान्य होणार नाही. यामुळे काँग्रेस शिवसेनेला दिलेला पाठिंबा काढू शकते म्हणून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळेल व भाजपाला सरकार बणवण्याची संधी पुन्हा मिळेल असे भाकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना एनडिएत येण्याचे निमंत्रण दिले. वंचितला लोकसभेत जास्त मते मिळाली पण एकही खासदार निवडून आला नाही फायदा एमआयएमचा झाला, विधानसभेत मते कमी मिळाली. म्हणून सोबत एनडीएत येण्याचे आठवलेंनी आंबेडकरांनी यावे असे निमंत्रण दिले. दिल्लीत सुरु शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांना त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. कृषी कायद्यात संशोधन करण्यासाठी सरकार तयार आहे. शेतकरी नेत्यांसोबत सरकारची चर्चा सुरू आहे. कायदे रद्द करण्याची मागणी संविधानानुसार योग्य नाही. मोदी सरकारने शेतकरी हितामध्ये हे कायदे बणवले पण काही पक्ष व संघटना गैरसमज पसरवत आहे. शेतकऱ्यांबद्दल सरकारला सहानुभूती आहे असे आठवले यांनी सांगितले.
राज्यात पक्ष बांधणीसाठी दौरा सुरु केला आहे. आगामी महापालिका, ग्रामपंचायत निवडणुकीत जसे शक्य होईल भाजपा सोबत आरपीआय असेल. पक्ष अंतर्गत निवडणूक घ्यायची आहे. 50 लाख सदस्य नोंदणीचे लक्ष ठेवले आहे. राज्य सरकारने भूमीहीनांना पाच एकर शेती द्यावी. मागासवर्गीयांनी विविध महामंडळाकडून घेतलेले कर्जमाफी करावी. अशा विविध मागणीसाठी आरपीआयच्या वतीने आंदोलन केले जाईल अशी माहिती पत्रकार परिषदेत आठवलेंनी दिली.
यावेळी पप्पु कांबळे, बाबुराव कदम, ब्रम्हानंद चव्हाण, डॉ. विजय गायकवाड, कांतीकुमार जैन, मिलिंद शेळके, संजय बनसोडे, संजय ठोकळ, किशोर थोरात, बाळकृष्ण इंगळे, अरविंद अवसरमल, नागराज गायकवाड, प्रकाश गायकवाड, मधुकर चव्हाण उपस्थीत होते .

No comments:

Post a Comment