Friday, November 20, 2020

शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपुर्ण ठरणार-ना. प्रा.वर्षा गायकवाड


मुंबई –महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्य़ातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा अशा सुचना शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड दिल्या आहेत.

या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपुर्ण ठरणार आहे.प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. वेळोवेळी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत व शिक्षकांच्या आरोग्याबाबत काळजी घ्यावी
.

No comments:

Post a Comment