Wednesday, May 27, 2020

राज्यात अफरातफरीचे वातावरण पसरावे यासाठी मोठं षडयंत्र, ‘त्या’ खोट्या मॅसेजचा सायबर क्राईमकडे तपास ;- सचिन सावंत

मुंबई, दि. २७ – राज्यात अफरातफरीचे वातावरण पसरावे याकरिता अशा त-हेचे सोशल मीडियावर मॅसेज तयार करून पसरवले जात आहेत. यासाठी मोठं षडयंत्र आहे. यात विरोधी पक्षाचा डाव असू शकतो, असा आरोप कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. सोशल मीडियावर अफवा पसरवणारा तो खोटा मॅसेजही सचिन सावंत यांनी शेअर केला आहे. माझं व गृहमंत्री अनिल देशमुख यांचे याबाबत बोलणं झालं आहे. सायबर क्राईमकडे तपास सोपवला असल्याची माहितीही सावंत यांनी दिली. अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
* काय आहे तो खोटा मॅसेज.
दरम्यान, मुंबई आणि पुणे ही दोन शहरे येत्या शनिवारपासून १० दिवसांसाठी पूर्णत: लॉकडाऊनमध्ये असणार असा मॅसेज व्हॉट्सएप ग्रुपमध्ये फिरत आहे. महाराष्ट्र सरकारची एक बैठक सुरू असून कोणत्याही क्षणी पूर्णपणे बंदचा निर्णय घेतला जाईल, असे या मॅसेजमध्ये नमूद केले आहे. सदरचा हा मॅसेज पूर्णपणे खोडसाळ आहे. अफवा पसरविण्याच्या उद्देशाने तो मॅसेज टाकला जात असल्याचे स्पष्टीकरण शासनातर्फे देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment