*30 लाख च्या आसपास लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याची दयनिय अवस्था ?
बीड:-सध्या कोरोना व्हायरस या विषाणूने जगात थैमान घातले आहे.आणि भारतातील राज्याच्या तुलनेत महराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना बाधीत अढळले आहेत, या धर्तीवर आरोग्य विभागाच्या वतीने चोख खबरदारी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रत्येक दवाखान्यात एक रूम अश्या बाधितांसाठी ठेवण्यात आली आहे असे ही सांगण्यात आले आहे.
मात्र बीड जिल्ह्यात या साठी कोणत्या कोणत्या खबरदाऱ्या घेतल्या जात आहेत याचा आढावा जेव्हा घेईला गेला, तेव्हा एक भयानक वास्तव समोर आले ते म्हणजे सरकारी दवाखान्यात अत्यावश्यक सेवेसाठी असते ती म्हणजे आंबूलन्स.
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रुग्णांना रेफर करण्यासाठी तसेच तातडीने रुग्णांचा जीव वाचवण्यासाथी या रुग्ण वाहिकांचा उपयोग केला जातो. मात्र बीड जिल्ह्यात अत्यावश्यक सुविधांनी सज्ज अश्या रुग्ण वाहिकां ह्या फक्त 4 असून या वर जिल्ह्यातील जवळपास 30लाख लोकांच्या आरोग्याची जीमेदरी या 4 अंबुलन्स वर येऊन ठेपली आहे.
याबाबत जिह्याचे शल्य चिकिषचक यांच्याशी महियी घेतली असता ते म्हणाले की, बीड जिह्याच्या जिल्हा रुग्णालयात दोन अंबुलन्स ला व्हेंटिलेटर ची सुविधा आहे तसेच अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात एक अंबुलन्स आहे तर नेकनूर येथील रुग्णालयात एक अंबुलन्स अश्या एकूण चारच व्हेंटिलेटर ची सुविधा असणाऱ्या रुग्ण वाहिक सध्या बीड जिल्ह्यात असून या चार रुग्ण वाहिकांच्या मदतीने रुग्णांना रेफर करण्यात येते.
सामाजिक व न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात अशी आरोग्याची अतिदक्षता घेलती जात असेल तर, मग कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास कसे होईल हा एक गंभीर प्रश्न सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.
यामुळे खबरदार कोणी घराच्या बाहेर पाडलं तर….आरोग्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील ही आहे उपाय योजना?
No comments:
Post a Comment