* आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद_
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाले आहे. त्यामुळे नियमितपणे रक्तदान करण्याची प्रक्रिया थंडावली आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री धनंजय मुंडेंनी रक्तदात्यांना अधिकाधिक प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने सकारात्मक प्रतिसाद देत दै. जगमित्र व शुभम देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 30 मार्च रोजी रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.
कोणालाही केव्हाही रक्ताची गरज पडू शकते. रक्तदानाचे महत्त्वही सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे आयोजकांनी मोठ्या संख्येने बाजीप्रभू नगर मधील दै. जगमित्रच्या मुख्य कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेदरम्यान रक्तदान करावे. यावेळी सोशल डिस्टन्स पूर्णतः पाळला जाईल. इच्छित व्यक्तींनी भागवत गांगर्डे 8668287843, शुभम देशमुख 9657613333, रंगनाथ सावजी 9850944242क्रमांकावर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment