अहमदनगर ;- (प्रतिनीधी ) कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी “सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असे विधान ओझर येथे झालेल्या किर्तनात त्यांनी केलं. त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेतल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी आज नगरमध्ये आल्यानंतर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन इंदुरीकर महाराजांविरोधात लेखी तक्रार दिली. त्यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी गुन्हा दाखल न झाल्यास इंदोरीकर महाराजांच्या तोंडाला काळं फासू, असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.
येत्या दोन-तीन दिवसांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर आम्ही अकोले येथे त्यांच्या आश्रमात जाऊन त्यांच्या तोंडाला काळं फासू असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. नगरमध्ये येऊ देणार नाही, असा इशारा मला दिला होता. पण प्रत्यक्षात कुणीही आडवं आलं नाही. अडवणार म्हणणारे पेड कार्यकर्ते असावेत. त्यांचा काही तरी लाभ होत असावा, त्यामुळे ते आमचा विरोध करत असल्याचं देसाई यांनी सांगितलं आहे. दरम्यान, तृप्ती देसाई यांची गाडी सुप्यावरून जात असताना काही वारकऱ्यांनी त्यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवले.
दरम्यान, मुख्यमंत्री, अनेक मंत्री तसेच काही राजकारणी मंडळी इंदुरीकर महाराजांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांने हे बंद करावे, अन्यथा त्यांनाही मंत्रालयात कोंडून घेऊन अद्दल घडवू, असं त्या म्हणाल्या. इंदुरीकर महाराज महिलांबद्दल जे काही बोलत आहेत, त्याचे पुरावे आम्ही पोलिसांना दिले आहेत, त्यावर कारवाई व्हावी. आम्हाला नगरमध्ये येऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. प्रत्यक्षात कुणीही आडवे आले नाही. अडवणार म्हणणारे पेड कार्यकर्ते असावेत. त्यांचा काही तरी लाभ होत असावा, त्यामुळे ते आमचा विरोध करीत आहेत, असंही त्या म्हणाल्या.
सम विषम वक्तव्यामुळे वादात अडकलेल्या कीर्तनकार इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई यांनी केली होती. त्यासाठी त्या आज (ता. १८ ) अहमागनगरच्या पोलिस अधीक्षकांना भेटण्यासाठी रवाना झाल्या होत्या. तेव्हा, शिवसेनेच्या कार्यकर्त्या स्मिता आष्टेकर यांनी ‘नगरमध्ये येऊन दाखवाच’ असं आव्हान देसाईंना दिलं होतं.
भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई यांना नगर जिल्ह्यात पाय ठेवून दाखवाचं, असं आव्हान दिलं होत. स्मिता आष्टेकर यांच्या या आव्हानामुळे तिथे गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता होती. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी स्मिता आष्टेकर यांना अहमदनगर सुपा टोल नाक्याजवळ ताब्यात घेतलं.
दरम्यान, तृप्ती देसाई अहमदनगरला येण्यापूर्वीच इंदोरीकर महाराजांनी आपल्या वक्तव्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली. परंतु नुसती माफी मागून काही होणार नाही, इंदोरीकरांवर गुन्हा दाखल व्हावा, गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं देसाईंनी सांगितलं.
मूर्ख तृप्ती बाई आहेत राज्यात दोन दोन महिलांवर जळीत कांड सारख्या घटना झाल्या हीच तोंड बंद होत तेव्हा कुठं गेली समाज सुधारक. अशा डुप्लिकेट स्वतःला समाज सुधारिका म्हणून घेणाऱ्या वृत्तीचा निषेध असो.
ReplyDelete