परळी वैजनाथ ;(प्रतिनीधी )परळी तालुक्यात 2019 मधील खरीप हंगामात अतीवृष्टी झालयाने शेतक-यांचे पिकांचे नुकसान झाले होते. त्यावेळस तलाठयां मार्फत पंचनामे करण्यात आले होत. परंतु अद्यापही तालुक्यातील बहादुरवाडी, वानटाकळी तांडा, वाका, हाळम,खामगाव,सेलु,सबद्राबाद,वानटाकळी, माळहिवरा, आदी 9 गावांतील शेतक-यांचे खरीप अनुदान जमा झाले नाही तरी या 15 दिवसात शासनाने अनुदान त्वरीत जमा करावे अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी जिल्हाधीकारी व तहसिलदार याना केली आहे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या वतिने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी दिला.
No comments:
Post a Comment