Wednesday, July 28, 2021
राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अभिजित कुडे यांच्या प्रयत्नाने तात्काळ शेतकऱ्यांच्या शेतात पोहचले विद्युत ट्रान्सफॉर्मर.
गुंगीचे औषध बळजबरीने देऊन असह्य महिलेवर अत्याचार; गुन्हा दाखल.
परळीत सर्व काही मॅनेज करणाऱ्या गुटखा माफियाना परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले रंगेहात !
आर्थिक विवंचनेतुन दिव्यांग शाळा कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या.

माजलगाव : (प्रतिनीधी) माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील अभिमान दगडु पवार वय ३२ वर्षे दिव्यांग शाळा कर्मचाऱ्यांनी आर्थिक विवंचनेतून राहत्या घरात पत्राच्या आडुला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दि.२६ जुलै रोजी पहाटे घडली आहे.
माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे दिव्यांग शाळा असून तिथे अभिमान पवार हा सफाईगार या पदावर कार्यरत होता. सदरील दिव्यांग शाळा ही दिव्यांग कल्याण आयुक्तालय कडुन मे 2020 पासुन बंद असल्याने मागील 14 महिन्यापासून वेतन न मिळाल्याने तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे सर्वत्र लाॅकडाऊन असल्याने हातास काम मिळत नसल्याने तसेच पगारपत्रकावर काढलेले बँकेचे हप्ते कसे फेडायचे ? या आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलत अभिमान पवार यांनी गळफास घेऊन आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली.
अभिमान पवार यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी, आई, वडील भाउ बहिण असा परिवार आहे. अभिमान हा घरातील करता पुरूष होता. त्याच्या अशा अचानक जाण्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे. पवार कुटूंबीयावर मोठे दुख कोसळले आहे.
शेतकऱ्यासाठी मोठी बातमी ! महाराष्ट्रातील पुरग्रस्त शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून ७०० कोटींची मदत जाहीर.

दिल्ली ; (कांतीकारी साथी न्युज) कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. केंद्राने पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जवळपास ७०० कोटी मंजूर केले असल्याची माहिती दिली केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली. राज्यात काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका हा राज्यातील शेतीलाही बसला आहे. पुराचे शेतात घुसल्याने प्रवाहाच्या वेगात ही पिकेही वाहून गेली आहेत तर काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान,विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पाचव्या दिवशीसुद्धा सभागृहात गोंधळ घातल्याने कामकाज थांबवावे लागले होते. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांना वारंवार कार्यवाहीत सहभागी होण्याचे आवाहन केले पण प्रश्नोत्तराचा तास अनेक वेळा तहकूब करावा लागला. त्यानंतर पुन्हा ४ वाजता सभागृहाचे कामकाज सुरु करण्यात आलं.
सभापतींना मध्यस्थी करण्यास भाग पाडले म्हणून विरोधकांनी आंदोलन सुरू केले. “कृपया आपल्या जागांवर परत या आणि कामकाजात भाग घ्या. आपण सरकारला आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे विचारू शकता. कृपया सहकार्य करा,” अशी बिर्ला वारंवार विनंत्या करत होते.
गोंधळाच्या परिस्थितीत तोमर यांनी महाराष्ट्रात आलेल्या पुराबद्दल भाष्य केले. ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आणि हजारो कुटुंबांचे नुकसान झाले आहे. “आम्हाला नुकत्याच आलेल्या पूरामुळे, विशेषत: शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा सखोल अहवाल मिळाला आणि त्याचे विश्लेषण केले आहे. गृह मंत्रालयाने ७०० कोटीं रुपये मदत म्हणून मंजूर केले आहे, ” असे तोमर म्हणाले.
Tuesday, July 27, 2021
डॉ.आर.बी.पवार यांचे कोरोना काळातील काम जनता विसरणार नाही.- पवार जनतेतला अधिकारी - अँड. अजित देशमुख
परळी नगर परिषद कार्यालयाच्या इमारतीवर उर्दू भाषेत नाव लावण्यासाठी एम आय एम च्या वतीने आंदोलनाचा इशारा. न.प.मुख्यधिकारी यांना दिले निवेदन .
शिपिंग क्षेत्रात नोकरीचे आमिष दाखवून होत असलेल्या आर्थिक फसवणुकी बाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी राज्यपालांना निवेदन.
80 हाजार रूपयांची लाच घेताना लाचखोर पीएसआय ताब्यात !
आष्टी ( प्रतिनीधी) अटकपूर्व जामीन रद्द न करण्यासाठी तब्बल ऐंशी हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अंभोरा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे यास पकडण्यात आले. औरंगाबाद येथील एसीबीने सोमवार (दि.26) रोजी दुपारी ही कारवाई केली.
लोकसेवक पोलीस उपनिरीक्षक राहुल पांडूरंग लोखंडे, यांना पकडण्यात आलंय.लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे .
त्यांनी 20 जुलै रोजी तक्रारदारविरूध्द अंभोरा पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हयात मंजूर असलेला अटकपूर्व जामीन हायकोर्टाकडून रद्द न करण्यासाठी व गुन्ह्यात असलेल्या गाड्या जप्त न करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती 80 हजार रूपये देण्याचं ठरलं. त्यांनतर सोमवारी औरंगाबाद एसीबीने कारवाई करत लोखंडे यांना पकडलं. याबाबत अभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
परळीच्या आठवडी बाजारातील घटना महिलेची फसवणूक. सोन्याचे दागिने केले लंपास; आरोपी फरार
Sunday, July 25, 2021
भाजप पक्षावर कार्यकर्ते नाराज पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त परळीत बॅनरबाजी, भाजपच्या नेत्यांचे फोटो मात्र गायब.
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा उद्या म्हणजे 26 जुलैला वाढदिवस आहे. त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी परळी शहरात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. पण पंकजा मुंडेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी छापण्यात आलेल्या बॅनरवर भाजपच्या एकाही नेत्याचा फोटो पाहायला मिळत नाही. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या समर्थकांमधील नाराजी पुन्हा एकदा उघड होताना दिसत आहे.
* पंकजा मुंडेंकडून कार्यकर्त्यांना धीर
* पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांची नाराजी
पंकजा मुंडे यांनी मुंबईत या नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढत त्यांचे राजीनामे स्वीकारले नाहीत. यानंतर आता पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त छापलेल्या बॅनरवरुन समर्थकांनी नाराजी दाखवण्यास सुरुवात केली आहे.
* एकाही भाजपच्या नेत्याचा फोटो नाही
पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. परळी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, टॉवर चौक, उड्डाणपूल या ठिकाणी हे बॅनर लावले आहे. मात्र या बॅनर्सवर पंकजा मुंडे यांच्या पदाचा उल्लेख वगळता एकाही भाजपच्या बड्या नेत्याचा फोटो छापण्यात आलेला नाही. त्यामुळे जरी पंकजा मुंडे यांनी आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी मुंडे समर्थकांनी हे स्विकारलेले नाही. त्यामुळे आता बॅनरवरुन नवे राजकारण सुरु होण्याची शक्यता आहे.
Saturday, July 24, 2021
ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत ?
अहमदनगर - (प्रतिनीधी) मुलाच्या जन्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने अडचणीत सापडलेल्या प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्यामागे लागलेले शुक्ल काष्ठ काही कमी होताना दिसत नाहीत. संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यालायाने इंदोरीकर महाराजांना दिलासा दिला होता. मात्र, या निकालाविरोधात अंधश्रद्धा निर्मुलन समितीपाठोपाठ सरकारी पक्षानेही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.
संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल देताना, त्यांच्याविरुध्दचा खटला रद्द केला होता.
मात्र, या निर्णयाविरोधात महाराष्ट्र अंनिसने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. अंनिस पाठोपाठ सरकारी पक्षानेही संगमनेर न्यायालयाच्या निर्णयाला खंडपीठात आव्हान दिले आहे. सरकारी पक्षाने गुरुवारी (ता.२२) याचिका दाखल केली.
नेमकं काय आहे प्रकरण
एका कीर्तनात बोलताना इंदोरीकर महाराजांनी “स्त्री संग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो आणि विषम तिथीला झाला, तर मुलगी होते..” असं वादग्रस्त वक्तव्य केले होते. लिंग भेदभाव करणारे हे वक्तव्य असल्याचा आक्षेप घेत, जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना ‘पीसीपीएनडीटी’ कायद्यानुसार नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते.
इंदोरीकर महाराजांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, इंदोरीकर महाराजांनी हे वक्तव्य कुठे, कधी केले, याबाबत कुठलाही पुरावा नसल्याचे कारण देत अहमदनगर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला नाही.
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी याबाबत पाठपुरावा केला. या प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिले. त्यानंतर 26 जून 2020 रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. संगमनेर कोर्टाने इंदोरीकर महाराज यांना समन्स बजावून कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिले होते. मात्र, नंतर त्यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली होती.
Monday, July 19, 2021
परळी न.प.च्या पैशाची मंत्र्याच्या वाढदिवसाला उधळपट्टी.
* होर्डिंग लावून जनतेने ओऽऽ सेठ.. तुम्ही नादच केलाय थेट.. म्हणत समस्येकडे दाखवले बोट.

परळी वैजनाथ - (प्रतिनीधी) कोरोना संकटामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असतानाच परळी नगरपालिका सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपयांच्या जाहिरातीवर पैशांची उधळपट्टी करत असल्याचं चित्र पाहावयास मिळालं. होर्डिंग, बॅनर व वाढदिवसाचा जल्लोष यामध्ये नागरी समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे. शेवटी आपल्याच मस्तीत जल्लोष साजरा करणाऱ्या नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी व आपली समस्या मांडण्यासाठी सर्वेश्वर नगर मधील नागरिकांनी फक्त मतं मागायला येता….ओ…शेठ…. तुम्ही नादच केला थेट अशा आशयाच बॅनर लावत चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे. निदान आतातरी नगरपालिका जागी होऊन सामाजिक न्याय देईल काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

एकीकडे कोरोना संकटामुळे धन्वंतरी असलेल्या वैद्यनाथाचे मंदिर बंद असल्यामुळे नागरिकांच होत्याचं नव्हतं केलं रोजगाराची समस्या उभी राहिली. खायला महाग झाली. लादलेल्या निर्बंधांमुळे जनता पिळवटून निघाली. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचं चित्र या संकट काळात पाहायला मिळालं. अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना जवळपास दीड — दोन वर्षाच्या कारकिर्दीत कवडीची मदत मिळाली नाही. शेतकरी आत्महत्यांचा आकडा कमी झाला नाही. कोरोना संकटात आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर गेल्याचे चित्र पहावयास मिळालं अशा स्थितीत अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. अशा एक ना अनेक समस्यांनी परळी सह जिल्ह्यातील जनतेची पुरती वाट लागली.जनतेला सावरण्याची ही वेळ असताना स्वतःला लोकनेते व स्व. गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार म्हणवून घेणारे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठ्या उत्साहात आपला वाढदिवस साजरा केला त्यासाठी लाखो रुपयांची उधळण करण्यात आली. यामध्ये परळीची नगरपालिका देखील सहभागी झाली.शहरात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त संपूर्ण शहरात मोठ मोठे बॅनर, होर्डिंग्जची दाटीवाटीने लावण्यात आले आहेत. यामध्ये नगरपालिका नागरी सुविधांकडे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नागरी समस्यांबाबत विरोधकांनी आवाज उठवणे गरजेचे असले तरी विरोधक असलेला पंकजा ताईंचा भाजप कोमात आहे. परिणामी सामाजिक न्यायाला परळी शहरात मुठमाती मिळाल्यामुळे
आता जनतेला रस्त्यावर उतरण्याची दुर्दैवी वेळ येऊन ठेपली आहे.
* सुर्वेश्वरनगरच्या जनतेची बॅनर गिरी...
सुर्वेश्वरनगरच्या प्रवेशद्वारावर जनतेने सध्या एक बॅनर झळकवत आपली समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे.यामध्ये ” जाहीर निवेदन ” अशा मथळ्याखाली संदेश आहे.तसेच या भागातील खराब व खोदुन ठेवलेल्या रस्त्यांची छायाचित्रे आहेत. “कुणी रस्ता देता का रस्ता….? सुर्वेश्वरनगरचा रस्ता झालाच पाहिजे ! सुर्वेश्वरनगर प्रभागातील चेम्बरचे काम अर्धवट केले आहे.सुर्वेश्वर मंदिरच्या सभोवतालचा सर्व रस्ता उकरुन ठेवला आहे.नगरसेवक कधीच आले नाहीत.यामुळे वार्ड क्रमांक १४ ला कोणीही वाली आहे की नाही असा प्रश्न सुर्वेश्वरनगर वासियांना भेडसावत आहे.रस्त्याच्या कामाकडे आता तरी लक्ष द्या.या भागातील रस्ते आता तरी नीट करा. फक्त मतं मागायला येता.…ओ…शेठ…. तुम्ही नादच केला थेट ” असा लक्षवेधी मजकूर टाकत अनोखी शक्कल लढवत नागरी समस्या मांडली आहे मांडली आहे.
ही आहे समस्या
110 कोटी रुपये बजेट असलेल्या भुयारी गटार योजना व मलनिस्सारण प्रकल्प कामामुळे रस्त्यांची चाळणी करण्यात आली आहे. यातच सुर्वेश्वर नगर भागातील रस्ता तब्बल एक वर्षापासून उखडून ठेवला आहे. त्यामुळे अनेक वेळा जनतेला अपघातांना सामोरे जावे लागले. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या रस्त्यावरून जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यातच पुन्हा कोरोना संक्रमणाची तिसरी लाट येणार असल्याचं म्हटलं जात असल्यामुळे जनतेत आणखी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु स्वतःच्या वाढदिवसासाठी लाखो रुपये खर्च करत नगरपालिकेच्या पैशाची उधळपट्टी करणारे लोकनेते जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेतील का? ज्या विभागाचे ते मंत्री आहेत त्याचे ” सामाजिक न्याय “असलेले नाव सार्थकी ठरवतील काय ? येणाऱ्या काळात तरी सत्ताधारी व विरोधकांच्या आडकीत्यात सापडलेल्या परळीकरांची सुटका होईल काय ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे
Saturday, July 17, 2021
परळीकरांच्या सेवेत स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोक्षवाहिनी स्वर्गरथाचे लोकार्पण !
आषाढी वारीवर निर्बंध निषेधार्य;विश्व हिंदू परिषदेच्या वतीने परळीत निवेदन.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या आषाढी वारीवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत.सरकारच्या या जुलमी निर्णयाच्या विरोधात विश्व हिंदू परिषदने परळीत आज दि.१६ जुलै रोजी निषेध आंदोलन केले. याबाबत तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.
शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.अगदी निजाम राजवटीतही वारी सुरुच होती.वारीला कोणतीही आडकाठी नव्हती.सध्या राज्यात असणाऱ्या तीन पक्षांच्या सरकारने मात्र वारीवर निर्बंध घातले आहेत.हा निर्णय चुकीचा आहे.सरकारच्या या निर्णयाचा विश्व हिंदू परिषद निषेध करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
कोरोनाविषयक नियम पाळून मर्यादित संख्येत पंढरपूरला जाण्याची तयारी दर्शवली होती.वारी २० दिवसांऐवजी १० दिवस करावी.गरज असेल तर केंद्रीय पोलिस बल मागवावे.दिवसा वारीमुळे संसर्गाचा धोका असेल तर रात्रीच्या वेळी जाण्याची परवानगी द्यावी.मुक्काम गावाबाहेर करण्यासह आणखी काही नियमांचे पालन करत वारीला परवानगी मागितली होती.पण सरकार तयार झाले नाही.
सरकारने वारीला परवानगी नाकारल्यामुळे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निवेदन देताना प्रखंड अध्यक्ष सौ.वर्षा ताई अनिल जोशी,जिल्हा पालक मंत्री श्रीपाद कुलकर्णी, प्रखंड उपाध्यक्ष अरुणा ताई परळीकर, जगदीश पाठक, प्रखंड मंत्री शैलेश पांडे,अनंता महाराज जोशी वडगाव, लोखंडे वडगाव, कल्पनाताई चाटूरीकर देशपांडे आदींसह पदाधिकारी उपस्थिती होती.
बीड चौफेरच्या प्रथम अंकाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन.
Sunday, July 11, 2021
स्वकुळ साळी समाजाच्या वतिने पवनराजे अर्बन निधी बॕकेच्या अध्यक्ष व संचालकांचा सत्कार संपन्न.
ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने 16 महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर खर्च केले तब्बल 155 कोटी.
मुंबई ( प्रतिनीधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने मागील 16 महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर तब्बल 155 कोटी खर्च केले असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिली आहे. या खर्चात जवळपास 5.99 कोटी रुपये सोशल मीडियावर खर्च केले आहे. प्रत्येक महिन्याला प्रसिद्धी मोहिमेवर ठाकरे सरकार 9.6 कोटी खर्च करत आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून आजमितीला प्रसिद्धी मोहिमेवर करण्यात आलेल्या विविध खर्चाची माहिती मागितली होती. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अनिल गलगली यांस 11 डिसेंबर 2019 पासून 12 मार्च 2021 या 16 महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर केलेल्या खर्चाची माहिती उपलब्ध करुन दिली. यात 2019 मध्ये 20.31 कोटी खर्च करण्यात आले असून नियमित लसीकरण प्रचारावर सर्वाधिक 19.92 कोटींचा खर्च आहे.
वर्ष 2020 मध्ये एकूण 26 विभागाच्या प्रसिद्धी मोहिमेवर एकूण 104.55 कोटी खर्च करण्यात आले. यात महिला दिनानिमित्त प्रसिद्धी मोहिमेवर 5.96 कोटी खर्च करण्यात आले आहे. पदम विभाग 9.99 कोटी, राष्ट्रीय आरोग्य अभियानावर 19.92 कोटी, विशेष प्रसिद्धी मोहिमेवर 4 टप्प्यात 22.65 कोटी खर्च करण्यात आले आहे. यात 1.15 कोटींचा खर्च सोशल मीडियावर दर्शविला आहे. महाराष्ट्र नागरी विकास अभियानावर 3 टप्प्यात 6.49 कोटी खर्च करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने निसर्ग चक्रीवादळावर 9.42 कोटी खर्च केले असून यात 2.25 कोटींचा सोशल मीडियावर दर्शविला आहे. राज्य आरोग्य शिक्षण विभागाने 18.63 कोटी खर्च केले आहे. शिवभोजनाच्या प्रसिद्धी मोहिमेवर 20.65 लाख खर्च केला असून 5 लाखांचा खर्च सोशल मीडियावर दर्शविला आहे.
वर्ष 2021 मध्ये 12 विभागाने 29.79 कोटींचा खर्च 12 मार्च 2021 पर्यंत केला आहे. यात परत एकदा राज्य आरोग्य शिक्षण विभागाने 15.94 कोटी खर्च केले आहे. जल जीवन मिशनच्या प्रसिद्धी मोहिमेवर 1.88 कोटी खर्च केले असून 45 लाखांचा सोशल मीडियावर खपविला आहे. महिला व बाल विकास विभागाने 2.45 कोटींच्या खर्चात 20 लाख सोशल मीडियाचा खर्च दाखविला आहे. अल्पसंख्याक विभागाने तर कहर करत 50 लाखांपैकी 48 लाख सोशल मीडियावर खर्च करुन टाकले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने 3.15 कोटींच्या खर्चात 75 लाख सोशल मीडियावर खर्च केले आहे.,
अनिल गलगली यांच्या मते माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे 100 टक्के माहिती उपलब्ध नसल्याने ही आकडेवारी अधिक होऊ शकते. सोशल मीडियाच्या नावाखाली केलेला खर्च संशयास्पद आहे. त्याचशिवाय क्रिएटिव्हच्या नावाखाली दाखविलेल्या खर्चाचा हिशोब वेगवेगळया शंकांना वाव देत आहे. विभाग स्तरावर केलेला खर्च, खर्चाचे स्वरुप आणि लाभार्थीचे नाव संकेतस्थळावर शासनाने अपलोड करावे, अशी मागणी अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांस लिहिलेल्या पत्रात केली आहे.
भाजपमध्ये खळबळा पंकजाताई समर्थकांचे राज्यभरात राजीनामास्त्र.
बीड ;- भागवत कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या तालमीत वाढलेले प्रस्थ त्याना मंत्री करून भाजपने एक तर वंजारी समाजसकट ओबीसी समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न साधला आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातील नारायण राणे सकट इतर तीन जणांची वर्णी लागली.राणे यांची तळकोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी वर्णी लावण्यात आल्याची शक्यता आहे तसेच कपिल पाटील हे आगरी समाजातून येतात आगरी समाज हा पालघर, ठाणे,मुंबई या पट्यात विभागला असून शिवसेनेला मुंबई महापालिकेत शह देण्यासाठी हा हुकमी एक्का पुढी करण्यात आल्याचा निर्वाळा होतो.भरती पवार ह्या नाशिक मध्ये भाजपाची पेठ बसवण्यासाठी मंत्रिमंडळात त्यांची एन्ट्री झाली असे समजते.
भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा सोपवण्यात आला असला तरी या राजीनाम्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. यांच्यासह अजून 14 जणांनीही राजीनामा दिल्याची माहिती आहे.पंकजा ताई पत्रकार परिषद घेऊन मानल्या होत्या मी पक्षावर नाराज नाही पण कार्यकर्तांना मला समजून घयावे लागेल.त्या म्हणाल्या पक्षाला वाटले असेल नवीन चेहऱ्याला संधी देऊन फायदा हो असेल ,तर पक्ष हा सर्वोच्च असतो व्यक्तिगत निर्णय होत नसतात असे त्या व्यक्त झाल्या.
साडेसात लाखांची लाच घेताना दोन पोलीस अधिकाऱ्याला ACB ने रंगेहाथ पकडले!
सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुरूम चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील आरोपींना मदत करून गुन्ह्यातून सही सलामत सुटण्यासाठी सहकार्य करण्यासाठी पोलीस निरीक्षक संपत पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे याच्याकरवी 10 लाख रूपयाची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती साडेसात लाख रूपये देण्याचे ठरले.
त्यावरून तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर तक्रारीची खातरजमा करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जुना पुना नाका छत्रपती संभाजी महाराज चौकात सापळा लावला असता सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे याने पैसे स्विकारत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.
Saturday, July 10, 2021
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात; टेम्पोने दिली जोरदार धडक थोडक्यात बचावल्या.
प्रसंगावधान राखून पालकमंत्र्यांच्या वाहन चालकाने वाहनाची गती वाढवली. त्यामुळे वाहन पुढे गेले. मात्र पिकअपचा या वाहनाला पाठीमागील बाजूस असलेल्या कोपऱ्याला धक्का लागला. यामध्ये वाहनाच्या पाठीमागील बाजूचा भाग थोडा घासल्या गेला. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी पीकअप व्हॅन चालकास ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात नेले आहे. त्यानंतर पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी रामलिला मैदानावर पाहणी करून नंतर शासकिय विश्रामगृह येथे आल्या. त्यानंतर दुपारी प्रा. गायकवाड याच वाहनाने औरंगाबादकडे रवाना होणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
लेख...समान नागरी कायदा हा देशात होत असेल तर स्वागतार्ह अस पाऊल म्हणावे लागेल!
मी नाराज नाही समर्थक नाराज. – पंकजाताई मुंडेंचे स्पष्टीकरण.

- मुंबई : (प्रतिनिधी) मी राजकारणात व्यवसाय म्हणून नाही, तर व्रत म्हणून आले आहे. भाजपला मला संपवायच असं मला वाटत नाही. मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही, तर कार्यकर्ते मात्र नाराज असल्याचे मुंडे म्हणाल्या. दरम्यान प्रसारमाध्यमांन चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या. मी पक्षावर निष्ठा ठेवणारी कार्यकर्ती आहे असं म्हणत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या सर्व मंत्र्यांचे देखील त्यांनी यावेळी अभिनंदन केले.
भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी आज पत्रकारांशी वार्तालाप केला. विचारलेल्या प्रश्नांवर बोलतांना त्या म्हणाल्या की, केंद्रीय मंत्रीपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दिल्लीला जाण्यासाठी तिकीटही काढलं होतं. त्यांनी मला तिकीटाचे फोटोही पाठवले होते, म्हणून आम्ही मुंबईतच असल्याचं ट्विट केलं होतं. त्यानंतर आम्ही नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण आमच्या नाराज असण्याचा प्रश्नच नाही. महाराष्ट्र किंवा दिल्लीत कोणतंही पद द्यायचं असेल तर मुंडे कुटुंबाचं नाव चालतं. त्यामुळे आमचं नाव चाललं. पण आमच्या नाराजीचा प्रश्नच नाही. कारण आम्ही कोणतीही मागणी केली नव्हती.
भाजपमध्ये निर्णयाची एक पद्धत आहे. त्यानुसार घेतले जातात. सर्वच राज्यांच्या बाबतीत असे निर्णय घेतले आहेत. केवळ प्रीतम यांचंच नाही तर हिना गावित यांचं नावही चर्चेत होतं. पण नवीन लोकांना संधी देण्यात आली. त्यावर हरकत नाही. त्यांच्यात नेतृत्व क्षमता आहे. म्हणूनच त्यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे, असं सांगतानाच प्रीतम ताईंचं नाव चर्चेत होतं आणि योग्य होतं. पण आता या चर्चांना विराम दिला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी मंत्र्यांचं अभिनंदन का केलं नाही याचंही कारण सांगितलं. परवा केवळ संभाव्य मंत्र्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ठोस काही येत नव्हतं. त्यामुळे मी कुणाचंही अभिनंदन केलं नाही. मात्र, आता मी केंद्रीय मंत्र्यांचं अभिनंदन करते. राज्यातून मंत्री झालेल्यांचंही अभिनंदन करते, असं त्या म्हणाल्या. मी भारती पवार आणि कपिल पाटील यांच्याशीही मी फोनवरून चर्चा केली. त्यांचं अभिनंदन केलं. तसेच भागवत कराड यांनी मला रात्री साडेबारा वाजता फोन केला होता. त्यांना दिल्लीतून फोन आल्याचं आणि दिल्लीला जात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.
वंजारी समाजातून कोणी नेता पुढे जात असेल तर त्याच्या पाठिशी मी उभा राहणार आहे. मी खूप भाग्यवान आहे. मुंडे साहेबांनी मला राजकारणाचे धडे दिले. पायाला फोड आलेले असतांनाही पट्टया बांधून प्रचार केला हे विसरून चालणार नाही असे सांगतांना मुंडे साहेबांच्या आठवणीने त्या गहिवरून गेल्या. नेता महाराष्ट्राचा असतो, तो कोणत्या जातीचा नसतो त्यामुळे ओबीसीचा नेता असं म्हणणं बोलणं योग्य नाही असंही त्यांनी एका प्रश्नांवर बोलतांना सांगितलं.
गेवराईत चोरट्यांचा धुडगूस सुरुच. डिसीसी बँकेत तोडफोड. तर शेजारील चार दुकानातील लाखोचा ऐवज लुटून चोरटे पसार.

गेवराई : (प्रतिनिधी) गेवराई शहरात चोरट्यांचा धुडगूस सुरुच असून शुक्रवारी रात्री येथील कोल्हेर रोडवरील जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरट्यांनी कँबीनसह संगणकाची तोडफोड केली. तसेच शेजारील किराणा, कपडे दुकानाचे गोडाऊनसह इतर दोन दुकाने फोडली. यामध्ये लाखाहून अधिक रुपयांचा ऐवज चोरी गेला असल्याचे सांगितले जाते.
गेवराई शहराला मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी लक्ष केल्याचे वारंवार होणाऱ्या घटनांमुळे सिध्द होत आहे. गोरगरीबांचे पशुधनसह दुचाकी, चार चाकी वाहने चोरट्यांनी लंपास केली आहेत. तसेच चार दिवसांपूर्वीच ताकडगाव रोडवरील पाच दुकाने व एका जणाचे घर चोरट्यांनी फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला होता. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असताना व पाठीमागील घटनेचा शोध पोलिसांना लागलेला नसताना पुन्हा शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कोल्हेर रोडवर धुडगूस घातला. या रोडवरील असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरट्यांनी शटरचे लाँक तोडून आत प्रवेश केला. मात्र आतमध्ये कँश न मिळाल्याने चोरट्यांनी कँबीनसह संगणकाची तोडफोड केली. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा बँकेशेजारील किराणा दुकान, कपडे दुकानाचे गोडाऊन व इतर दोकानाकडे वळवून कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत रोख रक्कमसह इतर साहित्य असा मिळून लाखाहून अधिक रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. सकाळी नागरिक उठल्यानंतर हा प्रकार लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान गेवराई शहरात मागील काही दिवसांपासून सातत्याने चोरीच्या घटना होत असताना पोलिस नेमके करतात काय ? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
Friday, July 9, 2021
जागतिक आरोग्य संघटनेचा कोरोनाच्या कप्पा व्हेरियंट बद्दल इशारा.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२० मध्ये कप्पा व्हेरिएंट पहिल्यांदा भारतात आढळून आला होता. या व्हेरिएंटला B.1.617.1 तर डेल्टा व्हेरिएंटला B.1.617.2 असे कोड देण्यात आले आहेत. मात्र, कप्पा व्हेरिएंटची रुग्णसंख्या आणि प्रसार पाहाता अजूनपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेनं हा विषाणू चिंतेचं कारण ठरला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे ‘समान नागरी कायदा’ करण्याचे निर्देश
जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या पोटनिवडणूकांना स्थगित !

मुंबई :कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरली नसतानाच तिसऱ्या लाटेची आणि डेल्टा प्लसचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची भिती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील ५ जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी एस मदान यांनी केली .
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या ५ जिल्हा परिषदांमधील ७० निवडणूक विभाग आणि ३३ पंचायत समित्यांमधील १३० निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी १९ जुलै २०२१ रोजी मतदान होणार होते; परंतु ७ जुलै २०२१ रोजी राज्य शासनाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.
सर्वोच्च न्यायालयाचे ६ जुलै २०२१ रोजीचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडून कोविड-१९ बाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते. त्याआधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथिल करण्यात आली आहे. कोविड-१९ ची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असेही मदान यांनी सांगितले.
Sunday, July 4, 2021
कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशी भविष्य.
कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस
- मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. घरच्यांना वेळ द्याल. खर्च वाढेल. वेळेचे आणि आर्थिक बाबींचे नियोजन करणे हिताचे. व्याप वाढवणे टाळा. शुभ रंग - लाल
- वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. यश मिळाले तरी नम्रतेने त्यात इतरांना सामावून घ्या. आनंद एकत्र राहून साजरा करा. 'जिभेची गोडी आनंद आणी' हे लक्षात ठेवा. शुभ रंग - निळा
- मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: आजचा दिवस प्रगतीचा आहे. नवे कौशल्य शिका, आत्मनिर्भर बना. प्रगती कराल. यशस्वी व्हाल. यश डोक्यात जाऊ देऊ नका. व्यावहारिक निर्णय घ्या. शुभ रंग - हिरवा.
- कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: आजचा दिवस बरा जाईल. व्यावहारिक निर्णय घ्या. आपण बरे आपले काम बरे असेच राहा. नवी जबाबदारी घेणे टाळा. शुभ रंग - चंदेरी
- सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. प्रामाणिक प्रयत्न करा, यश मिळेल. सातत्यावर भर द्या. कायदा पाळा. तब्येत जपा. शुभ रंग - नारिंगी
- कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. करार विचारपूर्वक करा. व्यवहार जपून करा. कायदा पाळा. तब्येत जपा. आर्थिक बाबी आणि वेळेचे नियोजन हिताचे. शुभ रंग - पोपटी
- तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: आजचा दिवस छान जाईल. कृती महत्त्वाची आहे. प्रयत्नांमध्ये सातत्य असल्यास यश मिळेल. प्रामाणिक राहा. शुभ रंग - निळा
- वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. बोलताना संयम राखा. गोड बोलून काम पूर्ण करुन घ्याल. प्रयत्न करुन अडचणी सोडवाल. शुभ रंग - लाल
- धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. नव्या वाटा नव्या दिशा शोधा. प्रयत्न करा, यश मिळवा. व्यावहारिक राहा. तब्येत सांभाळा. शुभ रंग - निळा
- मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. कुणाला कमी लेखू नका. गोड बोला, वाद टाळा. व्यावहारिक निर्णय हिताचे. सामंजस्य लाभाचे आहे. शुभ रंग - राखाडी
- कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: आजचा दिवस बरा आहे. नम्रता महत्त्वाची. यश मिळाले तरी नम्रतेने त्यात इतरांना सामावून घ्या. आनंद एकत्र राहून साजरा करा. शुभ रंग - काळा
- मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: आजचा दिवस बरा आहे. चिंता सोडा. आला दिवस मजेत जगा. कायदा पाळा. घरच्यांना वेळ द्या. संवादातून मार्ग काढा. संयम पाळा. जपून शब्द वापरा. शुभ रंग - सोनेरी
मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारातील नावांना दोन दिवसात अंतिम स्वरूप ! महाराष्ट्रातील नारायण राणे यांच्या नावाची चर्चा.

सध्याच्या स्थितीत असे अनेक मंत्री आहेत ज्यांच्याकडे एकाहून अधिक विभागाची जबाबदारी आहे. ज्यात प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, स्मृती इराणी, नितीन गडकरी, धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र सिंह तोमर, डॉ. हर्षवर्धन, हरदीप सिंह पुरी यांच्या नावाचा समावेश आहे. मोदी कॅबिनेट विस्तारात यांच्याकडील खात्यांचा भार काढून घेतला जाऊ शकतो
सूत्रांच्या माहितीनुसार, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, महाराष्ट्रातील नारायण राणे, भूपेंद्र यादव आणि आणखी एक ज्येष्ठ नेता ज्यांच्याकडे बिहारसोबत गुजरातच्या प्रभारीपदाची जबाबदारी आहे. त्यांनाही कॅबिनेटमध्ये स्थान मिळू शकतं. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरूण गांधी, अनिल जैन, जफर इस्लाम, रामशंकर कठेरिया, अनुप्रिया पटेल यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे.
२०१९ मध्ये मोदी सरकारच्या स्थापनेनंतर जदयूला केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याची ऑफर भाजपानं दिली होती. परंतु त्यावेळी केवळ एक मंत्रिपद जदयूला दिलं जात होतं. त्यामुळे जदयूने भाजपाची ऑफर नाकारली. आता जदयू २ वर्षानंतर भाजपा कॅबिनेटमध्ये सहभागी होण्यास तयार आहे. मात्र जदयूमध्ये मंत्रिपदासाठी अधिक दावेदार आहेत. पण सरकारमध्ये १ किंवा २ पेक्षा अधिक मंत्रिपद मिळण्याची शक्यता फार कमी आहे.







